Archive for मार्च, 2010

डॉ. भालचंद मुणगेकर , सौजन्य – मटा

डॉ. राममनोहर लोहिया यांची जन्मतारीख २३ मार्च, १९१०. दोन दिवसांनी त्यांची शंभरावी जयंती. भारतीय समाजवादाचे सर्वांत प्रभावी प्रवक्ते डॉ. लोहियाच होते. त्यांच्या मूलगामी विचारांनी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श केला. त्यांच्या विचारांचा आजचा अर्थ सांगणारा हा विशेष लेख.

—————————-

काँग्रेस सोशालिस्ट पक्षाची १९३४ साली स्थापना झाली. बौद्ध तत्त्वज्ञानाचे भाष्यकार, मार्क्सवादी विचारांचा प्रभाव असलेले आणि समाजवादाला नैतिक अधिष्ठान हवे, असा आग्रह धरणारे आचार्य नरेंद देव मे १९३४ मध्ये पाटण्यातल्या पक्षाच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. जयप्रकाश नारायण त्याचे प्रमुख सूत्रधार होते. १९५६ साली आचार्य गेले. १९५३ साली समाजवादी कार्यक्रमांवर जयप्रकाशांची नेहरूंशी झालेली बोलणी फिसकटली. त्यामुळे, तसेच पक्षातील कारणांमुळे १९५४ साली जेपी सवोर्दयी चळवळीत गेले. १९५३ मध्ये अशोक मेहता ‘मागास अर्थव्यवस्थेतील राजकीय अपरिहार्यता आणि सहकार्याची समान क्षेत्रे’ असा सिद्धान्त मांडून काँग्रेस लोकशाही समाजवादीकडे जात आहे अशी भूमिका मांडून काँग्रेसमध्ये गेले. या पार्श्वभूमीवर १९५२ मधल्या पंचमढी अधिवेशनापासून १९६८ मध्य५हत्त्वाचा आहे. लोहियांनी मार्क्सनंतर अर्थशास्त्राचे स्वरूप कसे बदलले, उत्पादन तंत्रातील बदलांचा कामगारवर्ग आणि शोषणाच्या स्वरूपावर कसा परिणाम झाला, गरिबी-बेकारी-विषमता नष्ट करण्यासाठी भांडवलशाही आणि साम्यवाद हे दोन्ही पर्याय कसे गैरलागू आहेत हे यात सांगितले, तर ‘समाजवाद : काळा-गोरा’ या पुस्तकात पाश्चिमात्य देशातील समाजवादापेक्षा आशियातील समाजवाद कसा वेगळा असेल, केंद-राज्य-जिल्हा व खेडे या चौखांब्यावर आधारित विकेंदित अर्थव्यवस्थेचा पुरस्कार आहे. जमिनीच्या फेरवाटपावर आधारित शेतीची पुनर्रचना आणि मोठ्या उद्योगांचे राष्ट्रीयीकरण त्यांना अभिप्रेत होते. समाजवादी आणि संयुक्त समाजवादी पक्षांच्या जाहीरनाम्यात त्यांनी समाजवादाचे कार्यक्रम सुचविले. परंतु लोहियांसकट सर्व समाजवाद्यांच्या आथिर्क भूमिकेचे ‘श्रेष्ठ श्रेणीची संमिश्र अर्थव्यवस्था’ असे सारांशाने वर्णन करता येईल.

व्यक्तिस्वातंत्र्य आणि अहिंसेवर अपार निष्ठा असल्यामुळे लोहियांचा साम्यवादाला कडवा विरोध होता. त्यामुळे साम्यवाद्यांची ‘कामगार वर्गाची हुकूमशाही’ त्यांना मान्य असण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे भारतात साम्यवादी आणि समाजवादी चळवळी समांतरच नव्हेत, तर एकमेकांच्या कट्टर विरोधक राहिल्या. साम्यवाद्यांनी सुधारणावादी म्हणून समाजवाद्यांची हेटाळणी केली; तर समाजवाद्यांना जमातवाद्यांशी जवळीक करायला संकोच वाटला नाही. त्यातच साम्यवाद्यांच्या भूमिका दीर्घकाळ सोविएत युनियनवर अवलंबून राहिल्या. साम्यवादी आणि समाजवाद्यांच्या एकांगी आणि परस्परविरोधी भूमिकांमुळे भारतात श्रमिकांचे राजकारण सतत क्षीण राहिले.

आचार्य नरेंद देव आणि जेपींवर जसा मार्क्सवादाचा प्रभाव शेवटपर्यंत राहिला, तसा लोहियांवर गांधीजींचा राहिला. लोहिया मार्क्सवादाच्या मर्यादा सांगूनच थांबले नाहीत. तर त्यांनी मार्क्सवादाविरोधी भूमिका घेतली. पंचमढीत, कार्यर्कत्यांच्या आग्रहाने ‘मी मार्क्सवादी नाही’ किंवा मार्क्सवादाच्या विरोधात नाही,’ असे जरी लोहिया स्पष्ट म्हणाले, तरी ते शंभर टक्के गांधीवादी असल्यामुळे ते मार्क्सवादाच्या विरोधात असणे स्वाभाविकच होते. समाजवादी चळवळीत मार्क्सवादाच्या विरोधात मनोभूमिका तयार होणे, हा त्याचा अपरिहार्य परिणाम होता. समाजवादी चळवळीचे नुकसान होण्याचे तेही एक कारण आहे.

गैरकाँग्रेसवाद

१९६३मध्ये फरुकाबाद पोटनिवडणुकीतून लोकसभेत गेल्यानंतर त्यांनी पहिल्याच भाषणात तीस कोटी लोकांचे दरडोई उत्पन्न तीन आणे असल्याचे सांगून चचेर्चा प्रारंभ केला. परंतु संपत्तीबरोबर सर्व प्रकारची सत्ता आणि प्रतिष्ठेचेही विषम वाटप झाल्याचा त्यांना संताप होता. डॉ. आंबेडकरांशिवाय जातिव्यवस्थेमुळे समाजाचे कसे अध:पतन झाले, याचा सकस विचार फक्त लोहियांनी केला. ‘जात म्हणजे अपिरवर्तनीय वर्ग आणि वर्ग म्हणजे बंदिस्त जात’ अशी त्यांची मीमांसा होती. ‘जात म्हणजे बंदिस्त वर्ग’ या डॉ. आंबेडकरांच्या मीमांसेशी ती मिळतीजुळती होती.

भारतातील दैन्य, गरिबी, विषमता या साऱ्याला काँग्रेसच जबाबदार आहे, अशी खात्री झाल्यानेच लोहियांनी ‘गैरकाँग्रेसवाद’ मांडला आणि जनसंघापासून स्वतंत्र पक्षापर्यंत सर्वांची एकजूट करून १९६७ मध्ये नऊ राज्यांत संविद सरकारे आणली. लोहियांच्या निधनानंतर समाजवाद्यांचा ‘गैर काँग्रेसवाद’ इतका टोकाला गेला की जनसंघ असलेल्या जनता पक्षात आपले अस्तित्व विलीन करायला ते कचरले नाहीत. १९८० नंतर ‘हिंदू राष्ट्रवाद’ ही ठाम भूमिका असल्याने भाजपच्या रूपाने जनसंघ पुन्हा उभा राहिला. सत्तेवरही आला. परंतु १९८० मध्ये समाजवादी पक्ष आणि चळवळ कायमची संपली. नकारात्मक राजकारण आणि सुस्पष्ट राजकीय विचारप्रणालीचा पर्याय उभा करण्यातली असमर्थता हीच त्याची प्रमुख कारणे होत.

सांस्कृतिक संदर्भ

डॉ. लोहियांना स्वातंत्र्यानंतर राजर्कत्यांची मानसिकता, त्यांचे धोरणात्मक अग्रक्रम, साम्राज्यवादाच्या प्रतिकांविषयींची भूमिका, आथिर्क ढांचा, समाजरचना, विषमता इ. बाबतीत गुणात्मक बदल होईल, असे वाटले व तसे न झाल्याची मनस्वी चीड आली. त्यासाठी त्यांनी काँग्रेसला जबाबदार धरले.

ज्या ‘वंदे मातरम्’साठी हजारोंनी तुरुंगवास भोगला त्याऐवजी ‘जन गण मन’ राष्ट्रगीत केल्याचा त्यांना खेद होता. क्रिकेटला जवळपास मिळालेल्या राष्ट्रीय दर्जाचा राग होता. इंग्रजी हे शोषणाचे हत्यार असल्याची त्यांची भूमिका होती. लोहियांचा विरोध इंग्रजीला ‘भाषा’ म्हणून नव्हता, तिला मिळालेल्या असाधारण प्रतिष्ठेला होता. आरोपीच्या जीवनमरणाचा वाद न्यायालयात त्याला न समजणाऱ्या इंग्रजीत चालण्याला होता. आजही शुद्ध मराठी बोलणाऱ्यापेक्षा अशुद्ध वा चूक इंग्रजी बोलणाऱ्याला अधिक प्रतिष्ठा आहेच.

स्त्री-पुरुष समानता

डॉ. आंबेडकरांचा अपवाद सोडला तर स्त्रियांचे गौणत्व आणि त्यांची सक्षमता याचा विचार लोहियांइतका कुणी केला नाही. जातिप्रथा आणि स्त्रियांची अवनती ही भारताच्या अध:पतनाची दोन प्रमुख कारणे असल्याचे ते आग्रहाने म्हणत. कनिष्ठ जाती, अन्य मागास आणि मुसलमान यांना केवळ समान संधीच नव्हे, तर ‘विशेष संधीचा’ पुरस्कार करताना लोहियांनी त्यात स्त्रियांचाही समावेश केला. आज लोहियांनी महिला आरक्षणात ओबीसी व मुस्लिम महिलांच्या स्वतंत्र आरक्षणाचा आग्रह धरलाच असता.

विवाह आणि स्त्री-पुरुष संबंधाबाबत भारतीयांचे मन गलिच्छ असल्याचे लोहियांचे मत होते. पावित्र्याच्या कल्पनांमुळे स्त्रीची गुलामी फक्त चुलींपुरती राहिली नाही तर पापपुण्याच्या बेड्याही तिच्या पायात अडकल्या. त्यातही तिच्या शरीराला अधिक महत्त्व देण्यात आले. स्त्री-पुरुष संबंधात दोनच अपराध आहेत : बलात्कार आणि खोटे बोलणे वा वचनभंग. सावित्रीपेक्षा बंडखोर दौपदीविषयी अभिमान वाटणाऱ्या लोहियांना रुढी व संकेतांच्या विरोधात तरुणींचे बंड अभिप्रेत होते. स्त्रियांची चळवळ आज या दिशेने जाते आहे ही समाधानाची गोष्ट आहे.

गौर वर्णाचे साम्राज्य

आशियासारख्या उष्मा कटिबंधात गौरवर्ण हा सौंदर्याचा निकष मानणे, हा सौंदर्यशास्त्राचा विपर्यास आहे, असे लोहिया म्हणत. दौपदी सावळी होती, याचा त्यांना अभिमान वाटे. जवळपास तीन शतके युरोपीय गोऱ्यांनी जगावर अधिसत्ता गाजविली. जेत्यांची गुणवैशिष्ट्ये नेहमीच पराभूतांवर लादली जातात. किंवा पराभूत ती भूषण म्हणून मिरवतात. लोहिया म्हणतात, ‘कृष्णवणिर्यांची जगावर सत्ता असती तर स्त्रीसौंदर्याचे निकष बदलले असते. राजकारण सौंदर्यकल्पनांवरही वर्चस्व गाजविते. अद्वितीय सत्ता तर सुंदरही दिसू लागते.’

अभिजात रसिकता

लोहियांनी भारतातील शिल्प, साहित्य आणि इतर कलांचा आस्वाद घेतला. त्यावर भाष्य केले. शिल्पकलेविषयी ते म्हणतात, ‘इतिहासाचे ग्रंथ कधीतरी नाश पावतात म्हणूनच की काय, भारतीय जनतेने अनंत काळ प्रचलित राहणाऱ्या कथा-कहाण्यांच्याद्वारे तो सांगून ठेवला आहे. इतिहास संतापला. त्याने सूड घेतला आणि सर्वांत अधिक काळ टिकणाऱ्या पाषाणावर चित्ररूपाने त्याने स्वत:ला खोदून ठेवले.’ परंतु ते त्वरित या पोकळपणावर बोट ठेवतात. एका बाजूला श्वास रोखून धरणारे शिल्पांतील चिरंतन सौंदर्य, तर दुसऱ्या बाजूला इतिहास आणि धर्मचिंतनातील रितेपण हा विरोधाभास त्यांना अस्वस्थ करतो. त्यांनी दिल्लीचे मनोज्ञ वर्णन केले आहे. ते म्हणतात की पॅरिस, वॉशिंग्टन, लंडन, टोकिया यांच्यापेक्षा दिल्ली सर्वांत मोहक आहे हे खरे, परंतु ती अत्यंत नीच वेश्या आहे. जेत्यांसमोर ती नेहमीच वक्ष:स्थळ उघडत आली आहे.

हवी नवी मांडणी

सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर समाजवादाचे स्वरूपच बदलले आहे. आता बाजारपेठेचे दुष्परिणाम कसे टाळता येतील, त्याचा विचार करणे अत्यावश्यक आहेच. त्यासाठी दैन्य, विषमता व बेरोजगारी दूर करून चिरंतन विकासासाठी बाजारपेठेवर निर्णायक व अतिरेकी भिस्त ठेवणारे आणि साम्यवादी या दोघांनाही लोकशाही समाजवादाचा स्वीकार केल्याशिवाय पर्याय नाही. जातिनिर्मूलन, स्त्री-पुरुष समानता, जमातवादविरोध, धर्मनिरपेक्षता, व्यामिश्र संस्कृतीवर आधारित राष्ट्रवाद, संतुलित प्रादेशिक विकास, जागतिक शांतता अशा मूलभूत कार्यक्रमांवर आधारित विचारप्रणाली तयार करावी लागेल. कोणत्याही एका ग्रंथात किंवा विचारप्रणालीत याची उत्तरे नाहीत. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय यावर आधारित लोकशाही समाजवादाची पुनर्मांडणी करणे, हीच डॉ. लोहियांना खरी श्रद्धांजली ठरेल!

अरुण करमरकर, सौजन्य-लोकसत्ता

माढा तालुक्यातील जळीतकांडात एक-दोन नव्हे आठजण जळून खाक झाले. ही आग अपघाताने लागलेली नाही, तर मुद्दामहून कोणीतरी लावलेली. आग लावणाऱ्याने ती चारी बाजूंनी धडाडून पेटेल याचा जणू कडेकोट बंदोबस्त केलेला..

सकाळीच दूरध्वनी खणखणला आणि त्यावरून माढा तालुक्यातल्या आणखी एका पारधी जळीताची दुर्वार्ता कानावर दणकली. आगीने होरपळून कोणीही दगावल्याची घटना मुळातच मनावर चरा खोदणारी. त्यात एक-दोन नव्हे आठजण जळून खाक झाल्याची ही घटना. सगळ्याच्या सगळ्या जळित व्यक्ती एकाच पारधी कुटुंबातल्या. त्या आठ जणात पाच ११ वर्षांच्या आतली लेकरं- एकतर केवळ ५ महिन्यांचं बालक आणि आग अपघाताने लागलेली नाही, तर मुद्दामहून कोणीतरी लावलेली. कोणीच बाहेर धावत येऊन वाचू शकले नाही किंवा बाहेरून कोणी मदत करावी यालाही सवड मिळाली नाही. म्हणजे आग लावणाऱ्याने ती चारी बाजूंनी एकदम धडाडून पेटेल याचा जणू कडेकोट बंदोबस्त केलेला. थोडक्यात घटनेचे पैलू एकाहून एक भयानक. क्रौर्याची परिसीमा, रानटीपणाचा कळस यासारखी सगळी विशेषणंही थिटी पडावीत अशी भीषणता.

गेल्या दहा-बारा वर्षांत सोलापूर-उस्मानाबाद परिसरातली वेगवेगळी गावं अशा घटनांनी प्रकाशात (?) येत राहिली आहेत. कधी पोलिसी अत्याचार, कधी गावगुंडांचा अनाचार, कधी गैरसमजापोटी सगळ्या समाजाचाच अनावर झालेला रोष तर कधी जमातीच्याच अंतर्गत आपसातले वैमनस्य.. कारण कोणतेही असो, बंदुकीच्या गोळीला- ठेचणाऱ्या दगडफेकीला- संघटित मारहाणीला किंवा अस्तनीतल्या निखाऱ्याने फेकलेल्या बोळ्याला बळी पडलाय तो पारधीच. माढय़ाजवळच्या निमगावला या दुष्टपर्वाचा आणखी एक अध्याय रंगला. गृहमंत्री तातडीने घटनास्थळी पोचले. जळीतांच्या नातलगांपासून पोलिसी सूत्रांपर्यंत सर्वानी एकमुखाने सांगितले- ‘आपसातल्या पूर्ववैमनस्यातून हे घडले आहे’- खरेही असेल ते. मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीचे शासकीय आश्वासन आबांनी लगेचच दिलेय. कुणी म्हणेल, आपसातल्या भांडणातून हाणामारी- नुकसान वा प्राणहानी झाली तर शासनाने का भरपाई द्यायची? उद्या गाव-गल्लीत घडणाऱ्या अशा सगळ्याच घटनांमध्ये शासन नुकसानभरपाई देईल काय? सामान्य तर्कशास्त्राच्या आधारे कुणीही या प्रश्नांचे उत्तर नकारार्थीच देईल. तशीही शासकीय नुकसान भरपाई (घोषणेनुसार प्रत्यक्ष पोचली तरीही) तात्पुरती मलमपट्टीच असते. गेलेले जीव भरपाईने परत येणार नाहीत. एवढय़ापुरतेच हे तात्पुरतेपण नाही. या आणि अशा घटनांमागची जी कारणपरंपरा आहे त्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करणारी सर्व स्तरातली अनास्था पुढेही तशीच चालू राहील हे त्यातले वास्तव अधिक भीषण आहे. पुन्हा अशी घटना घडेपर्यंत पारध्यांबाबतची संवेदना कुलुपबंद होईल. नव्हे, शासनाची वा राजकारण्यांचीच नाही तर, साऱ्या समाजाची ही संवेदनाच पुरती बधीर झालीय. तिला पुन्हा जाग कशी यायची हा मुख्य आणि मूलभूत प्रश्न आहे.

समस्येचे मूळ
ज्या भटक्या विमुक्त जातीबांधवांचे पारधी समाज हे एक अंग आहे, त्या समूहात ५४ जमाती, जवळपास पावणेदोनशे पोटजमाती आणि त्यांच्यात सामावलेला सुमारे दोन-अडीच कोटींचा समूह. हा काही कोणी परका, उपग्रहावरून आलेला समूह नव्हे. ज्या हिंदू समाजाचा घटक असल्याचा अभिमान वगैरे आम्ही बाळगतो, त्याच हिंदूंमध्ये याही बांधवांचा समावेश आहे. मात्र त्यांची आजची- म्हणजे स्वातंत्र्याच्या हिरक महोत्सवानंतरची अवस्था काय? अनिकेत, असहाय, अकिंचन आणि कमालीचा असुरक्षित अशा स्थितीत हे बांधव अक्षरश: जनावराहूनही बदतर जीवन जगत आहेत. ‘पडला दरोडा की धर पारधी’ हे समीकरणच बनून गेलंय. ते समाजाच्या मनामानसातही इतके खोलवर रुजलेय की जमावाने दगडाने ठेचून वा सामूहिक मारहाण करून पारध्यांना जिवे ठार मारल्याच्या घटनाही अपवादात्मक राहिलेल्या नाहीत. अशा मारहाणीत समाजातल्या सामान्य माणसाने अंगी धारण केलेली पाशवता आणि निमगावच्या घटनेत पारध्यांनीच अंगिकारलेली अमानुषता यात अर्थाअर्थी काहीच फरक नाही. पण क्रौर्याचा कायमचा शिक्का मात्र पारधी जमातीवरच. मुळात गावशिवारालगत  पाल बांधून राहायची परवानगी पारध्याला मिळणे दुरापास्त. ‘गावात पारधी नको’ या भावनेने लेकांना इतके पछाडून टाकलेय की त्याला हुसकावून लावण्यासाठी सारे मतभेद विसरून गावकरी एकवटतात. रोजगाराचे साधन मिळणे ही तर त्याहीपलिकडची दुस्तर बाब. पोट कसं भरायचं या प्रश्नाबरोबरच कधीही पोलिसांची धाड अवचितपणे पडेल या भीतीचीही टांगती तलवार डोक्यावर धारण करूनच दिवाभीतीसारखं रानोमाळ भटकायचं. अशा स्थितीत शेतावर मजुरीचं काम मिळणं आणि शिवारात झोपडं बांधायला जागा मिळणं ही फाईव्ह स्टार लक्झरीच. मग अशी लक्झरी मिळालेल्या कोणा सुरेश पवारच्या आठ बाय दहाच्या कुडाच्या झोपडीखालच्या जमिनीच्या तुकडय़ावर कुणा झुंबरबाईचा डोळा असणं स्वाभाविकच. तरीही डोळ्यादेखत सुरेशचा संसार-परिवार फुलतो, नांदतो म्हणजे काय? मनातला आकस मग पेट घेत जातो. पोलिसांच्या खबरेगिरीचे तेल आग आणखी भडकावते आणि धडाडून पेटलेली द्वेषभावना पाच महिन्यांच्या लेकरासह साऱ्या कुटुंबाचा घास घेऊन मोकळी होते. हे आणि असेच आजवर घडत आलेय आणि वेळीच जाणती उपाययोजना झाली नाही तर पुढेही घडत राहील. शासनाने दिलेली नुकसानभरपाई हा अशा उपाययोजनेचाच कणमात्र अंश. म्हणूनच तो कितीही तर्कदुष्ट भासला तरी समर्थनीय ठरतो. पण तेवढेच पुरेसे आहे काय?

शिक्षण, रोजगार आणि सामाजिक सुरक्षेचे अभय हे पारधी समाजाचे मूळ प्रश्न आहेत. निदान उगवती पिढी शिक्षित व्हावी यासाठी  यमगरवडीच्या माळावर वा अन्यत्रही प्रकल्प चालू आहेत. मात्र तेथे शिकणारी जी पारधी बालके आहेत त्याच्यातच निमगाव जळीतकांडाशी संबंधित पारधी बांधवांपैकी काहीजणांच्या मुलांचाही समावेश आहे. जवळजवळ प्रत्येक बालकाच्या बापावर दोन-तीन गुन्ह्यांची प्रकरणे दाखल आहेत. कुणाची आई-मावशी पोलीसी अत्याचाराला बळी पडलेली आणि विटंबित म्हणून जातपंचायतीनेही हिणवलेली आहे. अंधश्रद्धा, देवदेवस्की, जुनाट लग्नप्रथा, पोलिसी यंत्रणेशी असलेली ‘लव्ह-हेट’ रिलेशनशिप, त्यातून मनामनात घुसलेला संशयात्मा, अशा अनेकानेक गुंत्यांनी या बालकांच्या आई-बापांना, आजी-आज्यांना आणि सग्यासोयऱ्यांना गुरफटून टाकले आहे. याच गुंत्यातला कुठला तरी एखादा धागा उसवतो आणि कुऱ्हाडी परजल्या जातात. एकीकडे आश्रमशाळेच्या वर्गात संस्कारांचे धडे गिरवत असतानाच कुणाच्या बापाची-भावाची हत्या झाल्याची बातमी येऊन थडकते आणि मग त्या बालकांची शिक्षणाला अनुकूल मन:स्थिती टिकवून ठेवणे मुश्कील होऊन जाते. अन्याय, अत्याचार आणि अनाचाराच्या गर्तेपासून त्यांना अलिप्त करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसते.पण तरीही हे प्रयत्न सुरू ठेवायलाच हवेत. शिक्षणाच्या परीघात त्यांना आणणे, रोजगाराची सन्मानजनक साधने त्यांना उपलब्ध करून देणे आणि आपले बांधव म्हणूनच साऱ्या समाजाने त्यांचा मनोदय स्वीकार करणे या उपायांचा प्रामाणिक पाठपुरावाच पारध्यांना गर्तेतून बाहेर काढणारा आहे. तसे ते बाहेर निघाले तर समाजजीवन सर्वागसुंदर म्हणविण्याच्या पात्रतेचे ठरणार आहे. म्हणूनच साऱ्या समाजाने या कामी जाणता पुढाकार घ्यायला हवा. शासकीय यंत्रणेची या संदर्भातील अपेक्षित भूमिका तर बहुधा सर्वात मोठी अन् महत्त्वाची आहे.केवळ पारधीच नव्हे तर सगळ्याच भटक्या जमातीच्या उपेक्षित बांधवांची रीतसर नागरिकत्वाची नोंद करण्यापासून या प्रक्रियेची सुरुवात करावी लागणार आहे. त्या नोंदीनुसार त्यांच्या वसनाची, शिक्षणाची अन रोजगाराची व्यापक यंत्रणा कार्यरत करावी लागेल. हे काम कष्टप्रद अन् जिकिरीचे आहे हे तर खरेच. त्यासाठी आवश्यक असणारी समाजहितैषी अन् दीर्घकामी मानसिकता जिल्हाधिकाऱ्यांनी- डॉ. जगदीश पाटील यांनी या प्रक्रियेची जाणती सुरुवात केली आहे. सुमारे अडीच हजार पारध्यांची रीतसर नोंदणी करून त्यांना जात, रहिवास, नागरिकत्वाचे, मतदानाचे दाखले प्रदान केले आहेत. पण त्यालाही आता दीड वर्ष होऊन गेलेय. त्या नोंदींच्या आधारे शासकीय योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोचवून त्यांच्या प्रथमवसनाची व्यापक घडी बसविणे अद्याप बाकी आहे. शासकीय योजनांच्या कार्यवाहीची विविध वळणे त्यात अडसर निर्माण करीत आहेत. मंजुरीच्या आणि अंमलाच्या बाबतीत झारीतले शुक्राचार्य आडवे येत असावेत. त्याचबरोबर त्यांच्या, म्हणजे पारधी बांधवांच्या वसाहती उभ्या करण्यात संबंधित जागेजवळच्या गावकऱ्यांचाही विरोध झेलावा लागत असेल. प्रसार माध्यमांकडून याबाबत विधायक आणि क्रियाशील भूमिका घेतली जाण्यातही कसूर होत असेल. त्यामुळेच शासकीय यंत्रणा, सामाजिक संघटना, प्रसारमाध्यमे आणि सर्वसामान्य समाज या सर्वच घटकांमधून समजुतीची आणि एकसंधतेची भूमिका संघटित करण्याचा प्राधान्याने प्रयत्न व्हायला हवा. तसा झाला तर निमगावच्या ८ जळीत प्रकरणातून आपण योग्य तो बोध घेतला असे म्हणता येईल. स्वत: पारधी समाजबांधवांनीही या म्हणण्याच्या सुरात सूर मिसळणे ही तर निकडीची बाब आहेच. सर्वच समाजघटकांना हा संकल्प जागविण्याची प्रेरणा मिळो ही सदिच्छा!

सचिन परब, सौजन्य – मटा

चले जाव, करेंगे या मरेंगे, हे राम… अशा साधासुध्या शब्दांना वेदमंत्रांहून मोठं प्रामाण्य भारतवर्षात मिळालं. कारण त्यामागे मोहनदास करमचंद गांधी या साध्यासुध्या दिसणाऱया महापुरुषाच्या संतपणाचं सामर्थ्य होतं. हे संतपण आलं होतं ते खरयाच्या प्रयोगातून आणि संस्कारातून. देशोदेशींचे, पिढ्यानपिढ्यांचे संस्कार रिचवून असं सामर्थ्य उभं राहतं. त्यात एक संस्कार मराठी माती घडवणाऱ्या तुकाराम महाराजांचाही होता.

आपल्या मराठी मनांवर कळत नकळत असा संस्कार होत असतो. पण रिचवण्या आणि पचवण्याआधीच तो संस्कार कापरासारखा उडून जातो. मात्र गांधीजींनी तुकोबारायाचे संस्कार कसे पचवले होते, ते समजून घेण्याचा सोपा मार्ग आहे. गांधीजींनी तुकोबांच्या सोळा अभंगांचे भाषांतर वाचण्याचा. गांधीजींच्या भाषांतरात साहेबाचा भाषेचा, त्या भाषेच्या संपूर्णपणे वेगळ्या पार्श्वभूमीचा कोणताही अडथळा न होता तुकोबांचे विचार जसेच्या तसे वाचकांपर्यंत पोहचतात. लेखक आणि भाषांतरकारातलं असं अद्वैत क्वचितच अनुभवायला मिळतं. दोन सच्च्या वैष्णवांमधलं हे अद्वैत.

विशेष म्हणजे गांधीजींनी मराठी मातीत बसून हे लिहिलंय. हे भाषांतर त्यांनी येरवडा तुरुंगात म्हणजे त्यांच्या शब्दांत येरवडा आश्रमात बंदी असताना केलंय. त्यांच्या सगळ्या सोळा अभंगाचं भाषांतर आता एकामागून एक रोज देणार आहोत. त्यानंतर संतपरंपरेतल्या आणखी काही अभंगांची भाषंतरे आम्ही वारी संपेपर्यंत सादर करणार आहोत.

आज त्यातला पहिला अभंग गाधीजींचा सर्वाधिक आवडता अभंग. भाषांतराची तारीख आहे, १६ ऑक्टोबर. आपल्या मुलाला लिहिलेल्या पत्रांत त्यांनी या अभंगाचा उल्लेख केला आहे. त्यांना या अभंगांमध्ये आपली तीन माकडे दिसत असत…

पापांची वासना नको दांवू डोळा l त्याहुनि आंधळा बराच मी ll

निंदेचे श्रवण नको माझे कानी l बधिर करोनि ठेवी देवा ll

अपवित्र वाणी नको माझ्या मुखा l त्याजहुनि मुका बराच मी ll

नको मज कधी परस्त्रिसंगती l जनांतुन मातीं उठता भली ll

तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा l तू एक गोपाळा आवडसी ll

O God, let me not be witness to desire for sin, better make me blind;

Let me not hear ill of anyone, better make me deaf;

Let not a sinful word escape my lips, better make me dumb;

Let me not lust after another’s wife, better that I disappear from this earth.

Tuka says: I am tired of everything worldly, Thee alone I like, O Gopal.

संत नामदेवांनी भागवतधर्माची पताका अटकेपार लावली.  संपूर्ण भारतभर त्यांनी पांडुरंगाच्या भक्तीची मोहर उमटवली. गुजरातही त्याला अपवाद नव्हता. गुजराततेतल्या वैष्णव संतावंर नामदेवांचा प्रभाव स्पष्ट आहे. सर्वात प्रसिद्ध गुजराती संतकवी नरसी मेहतांच्या काव्यात तर नामदेवांचा उल्लेख अनेकदा येतो. ज्याने नामदेवासाठी दूधभात खाल्ला. ज्याने नामदेवासाठी मंदिर फिरवले असे भगंवताचे वर्णन त्यांनी केले आहे.

नरसी मेहतांच्या भक्तिकाव्याने सबंध गुजरातेवर प्रभाव टाकलाय. धामिर्क वैष्णव कुटुंबात जन्मलेल्या गांधीजींवरही त्याचा प्रभाव होता. विशेषत: नरसींच्या ‘वैष्णव जन तो…’ ने तर त्यांच्यावर लहानपणापासून गारूड केलं होतं. गांधीजींचा ध्यास नरसींनी वर्णन केलेला खरा वैष्णव बनण्याचाच होता.

त्यामुळे गांधीजींनी तुकाराम गाथा हाती घेतली असेल तेव्हा त्यांना ‘जे का रंजले गांजले’ हा अभंग सर्वात आधी आपला वाटला असावा. गांधीजींनी आपल्या अनुवादातही सर्वात वरचे स्थान याच अभंगाला दिले आहे.

शाळेतल्या निबंधपासून प्रमुख पाहुण्याच्या वापरून गुळगुळीत झाला असला तरी पुन्हा एकदा मूळातून वाचायला हवा. ‘आपल्या नोकरचाकरांवर मूलासारख प्रेम करणारा तोच खरा साधू’ अशी रोकडी व्याख्या त्यात आहे. आनंदाची गोष्ट ही इथे ही व्याख्या आणि त्याचा अनुवाद हे शब्दांचे बुडबुडे नाहीत. दोन्ही महात्म्यांनी हे शब्द आपल्या जीवनात उतरवून दाखविलेत.

जे का रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपले ।। १।।

तोची साधू ओळखावा ।। देव तेथे चि जाणावा ।।धृ.।।

मृदू सबाह नवनीत । तैसे सज्जनाचे चित्त ।। २।।

ज्यासि अंपगिता नाही । त्यासि घरी जो हृदयी ।। ३।।

दया करणे जे पुत्रासी । ते चि दासा आणि दासी ।। ४।।

तुका म्हणे सांगू किती । तो चि भगवंताची मूर्ती ।। ५।।

Know him to be a true man who takes to his bosom those who are in distress. Know that God resides in the heart of such a one. His heart is saturated with gentleness through and through. He receives as his only those who are forsaken. He bestows on his man servants and maid servants the same affection he shows to his children. Tukaram says: What need is there to describe him further? He is the very incarnation of divinity.

गांधीजी आणि आंबेडकर या दोन्ही महापुरुषांचा प्रवास एकाच दिशेने पण समांतर झाला. आंबेडकरवाद्यांनी गांधीजींना समजून घेतले नाही आणि गांधीवाद्यांनी आंबेडकरांना. दोघांचा वारसा सांगणाऱ्या पुढाऱ्यांनी या दोघांना एकत्र आणलं ते फक्त राजकीय फायद्यासाठी. अन्यथा या दोन्ही विचारधारा जवळही येऊ नयेत म्हणून डोळ्यात तेल घालून प्रयत्न केले.

असे कितीही प्रयत्न केले असले, तरी अनेक बाबतीत गांधी आणि आंबेडकर एकमेकांची गळाभेट अनेकदा झालीय. तुकाराम त्यातली एक गोष्ट. स्वत:ला’यातिहीन’ म्हणणारा आणि विद्रोहाची पताका उंचावणारा तुकाराम आंबेडकरांना आपलासा वाटलाच. पण तितकाच ‘विष्णुदास’ असणारा आणि पदोपदी संतसंग मागणारा तुकाराम गांधीजींना आवडणे तितकेच स्वाभाविक होते.  आपण दोघांच्याही पूर्वपरंपरेत शोभून दिसणारा तुकाराम समजून घेऊया. एकदा ते झाले की गांधी आणि आंबेडकर दोघेही आरशासारखे समोर दिसू लागतील.

महारासि सिवे। कोपे ब्राम्हण तो नव्हे।।

तया प्रायश्चित्त कांही। देहत्याग करितां नाही।।

नातळे चांडाळ। त्याचा अंतरी विटाळ।।

ज्याचा संग चित्ती। तुका म्हणे तो त्या याती।।

He who becomes enraged at the touch of a Mahar is no Brahmin.

There is no penance for him even by giving his life.

There is the taint of untouchability in him who will not touch a Chandal.

Tuka says: A man becomes what he is continually thinking of.

नंतरच्या काळात सर्वोदयीचे  आश्रमातल्या प्रार्थना, भजन हे सारे माणसं घडवण्याचेच प्रयोग होते. स्वत: मोहनदासाचा महात्मा बनण्याचा प्रवासही अशाच प्रयोगांचा होता. प्रयोग, सत्याचे प्रयोग. साधन स्वत:, साधक स्वत: आणि साध्यही स्वत:चंच. तुकारामही असेच आतआत डोकावत सत्यापर्यंत पोहोचलेले. भगवंताच्या भेटीसाठी स्वत:च धावायचं, स्वत:च पडायचं, स्वत:च स्वत:ला हुरूप द्यायचा आणि स्वत:च स्वत:ला घडवायचं. तुकारामांचा कोणी गुरु नाही. गांधीजींचही तसंच. त्यांनी अनेकांचा गुरु म्हणून उल्लेख केला, पण फुलटाइम गुरु त्यांनाही नव्हता.

तसं पाहिलं, तर सद्विचार हेच या दोघांचे मार्गदर्शक होते. हे विचार जीवनात उतरवण्यासाठी दोघांनीही आटापिटा केला. विचार जीवनात उतरविणं हेच ज्ञान असतं. सॉक्रेटिस याविषयी ठाम सांगतो , virtue is knowledge असे विविध सद्विचार गांधीजींनी आश्रम भजनमाला मध्ये एकत्र आणले आहेत. आजचा अभंग संतपणाबद्दलचा.

नाहीं संतपण मिळतें हें हाटीं। हिंडतां कपाटीं रानींवनीं ।।

नये मोल देतां राशी । नाहीं तें आकाशीं पातळीं तें।।

तुका म्हणे मिळे जिवाचियें साठीं । नाहीं तरीं गोष्टी बोलों नये ।।

Saintliness is not to be purchased in shops nor is it to be had for wandering nor in cupboards nor in deserts nor in forests. It is not obtainable for a heap of riches. It is not in the heavens above nor in the entrails of the earth below. Tuka says: It is a life’s bargain and if you will not give your life to possess it better be silent. 24-10-1930

पावन देश कोणता, तुकाराम महाराज म्हणतात, जेथे हरिचे दास जन्म घेतात तो. त्या अर्थाने महाराष्ट्र आणि सौराष्ट्र हे दोन्ही प्रदेश अती पावन. संतांची मांदियाळी दोन्हीकडे बहरली. गांधीजी सौराष्ट्रातलेच. दुदैर्व हे की सौराष्ट्रातली जातीची उतरंड अजूनही पूर्णपणे ढळलेली नाही. तुकारामांनंतर शंभर वर्षांतच देहू ते पंढरीच्या वाटेत असणाऱ्या पुण्यात अस्पृश्यांना थुंकण्यासाठी गळ्यात गाडगी बांधावी लागली.

पण म्हणून भागवत धर्माने केलेल्या क्रांतीचं महत्त्व कमी होत नाही. महाराष्ट्रात अशी एकही जात नव्हती ज्यात त्याकाळी एकही संत झाला नाही. तुकोबांनी आपल्या अभंगात या संतांची जातवार यादीच दिली आहे. हा एक सामाजिक दस्तावेजच आहे. ज्ञानदेवे रचिला पाया… तुका झालासे कळस या बहिणाबाईंच्या अभंगा इतकाच मोलाचा.भारतीय इतिहासातील एका मोठ्या सामाजिक क्रांतीचा हा सज्जड पुरावा आहे. गांधीजींनी अनुवादासाठी हा अभंग निवडला नसता तरच नवल. त्यांनी उभ्या केलेल्या स्वातंत्र्य संगरातही अशीच समाजाच्या प्रत्येक घटकांत त्यांना जागृती अपेक्षित होती. काही प्रमाणात ती सफलही झाली. दोन्ही क्रांत्या अस्सल भारतीय मातीतल्या होत्या. दोन्ही तत्त्वज्ञानांचं अधिष्ठान भक्ती होतं. परिभाषा ही आध्यात्मिक होती, भारतीयांच्या मनात रूजलेली. त्यामुळेच वेदांचा हवाला देत जाती-धर्म नाकारण्यात विरोधाभास उरला नाही…

पवित्र तें कुळ पावन तो देश। जेथें हरिचे दास घेती जन्म।।

कर्मधर्म त्याचे जाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक।।

वर्णअभिमानें कोण जाले पावन । ऐसें द्या सांगून मजपाशीं।।

अंत्यजादि योनि तरल्या हरिभजनें । तयाचीं पुराणें भाट जालीं।।

वैश्य तुळाधार गोरा कुंभार । धागा हा चांभार रोहिदास ।।

कबीर मोमीन लतिब मुसलमान। शेणा न्हवी जाण विष्णूदास।।

काणोपात्र खोदु पिंजारी तो दादु। भजनीं अभेदू हरिचे पायीं।।

चोखामेळा बंका जातीचा माहार । त्यासी सवेर्श्वर ऐक्य करी ।।

नामयाची जनी कोण तिच भाव ।  जेवी पंढरीराव तियेसवें।।

मैराळ जनक कोण कुळ त्याचें । महिमान तयाचें काय सांगों।।

यातायातीधर्म नाहीं विष्णूदासा ।  निर्णय हा ऐसा हा वेदशास्त्रीं।।

तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ। तारिले पतित नेणों किती।।

Blessed is that family and that country where servants of God take birth. God becomes their work and their religion. The three worlds become holy through them. Tell me who have become purified through pride of birth? The Puranas have testified like bards without reserve that those called untouchables have attained salvation through devotion to God. Tuladhar, the Vaishya, Gora, the potter, Rohidas, a tanner, Kabir, a Momin, Latif, a Muslim, Sena, a barber, and Vishnudas, Kanhopatra, Dadu, a carder, all become one at the feet of God in the company of hymn singers. Chokhamela and Banka, both Mahars by birth, became one with God. Oh, how great was the devotion of Jani the servant girl of Namdev! Pandharinath (God) dined with her. Meral Janak’s family no one knows, yet who can do justice to his greatness? For the servant of God there is no caste, no varna, so say the Vedic sages. Tuka says: I cannot count the degraded.

नामजपाला भारतीय अध्यात्म आणि तत्त्वज्ञानात मोठी जागा मिळाली आहे. भगवत्भक्तीच्या या पहिल्या पायरीबद्दल संतसाहित्यात सर्वाधिक लिहिले गेलंयं. विशेष म्हणजे सामाजिक दृष्टी असलेल्या संतांनी आणि वेदांताचा पुरस्कार करणाऱ्या नव्याजुन्या तत्त्ववेत्त्यांनीही नामजपला प्राधान्य दिले आहे.

तुकाराम महाराजांनी अनेक अभंगांमध्ये याच नामजपाचं महात्म्य गायले आहे. आजचा अभंगही त्यातलाच एक. हा अभंग सांगतो, विठोबाला शरण जाणं आणि त्याच्या नामाचा जप करणं हेच सगळ्या ज्ञानाचे सार आहे. मात्र लोक यापैकी पहिला भाग सोडून केवळ दुसरा दर्शनी सोपा वाटणारा नामजपाचाच मार्ग उचलतात. त्यामुळे देवाचिये द्वारी क्षणभरच काय तासंतास उभं राहूनही अधीर्मुर्धी मुक्तीही मिळत नाही.

गांधीजींनी अनेकदा रामनामाचा महिमा सांगितला आहे. त्यांच्या या श्रद्धेविषयीचे काही प्रसंगही आहेत. एवढंच नाही तर शेवटचा श्वास घेतानाही त्यांच्या मुखी रामनामच होतं.

वेद अनंत बोलला । अर्थ इतकाचि शोधिला ।।

विठोबासी शरण जावे । निजनिष्ठ नाम गावें ।।

सकळशास्त्रांचा विचार ।अंति इतकाचि निर्धार ।।

अठरापुराणी सिद्धांत । तुका म्हणे हा चि हेत ।।

The essence of the endless Vedas is this:

Seek the shelter of God and repeat His name with all thy heart.

The result of the cogitations of all the Shastras is also the same;

Tuka says: The burden of the eighteen Puranas is also identical.

‘कसं जगायचं, कसं वागायचं’ या विषयावरच सर्वाधिक आणि सवोर्त्तम चिंतन भारतात झालं. दुदैर्व हेच आयतेपणाला मिळालेल्या फाजील प्रतिष्ठेमुळे या सगळ्या चिंतनाचे वाटोळे झाले. कर्मसिद्धांत, कर्मकांड यांना तर अकर्मण्यतेसाठी पूरेपूर वापरून घेण्यात आलं.

‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ चही तेच झालं. वास्तविक हे समर्पण आणि भगवतनिष्ठेच्या परमावधीचे तत्त्वज्ञान आहे. मी भगवंताचे काम करीन, तर माझा चरितार्थ तोच चालवेल असा विश्वास सांगणारं हे तत्त्वज्ञान. हे जीवनात उतरवणही महाकर्मकठीण.

भारतीय तत्त्वज्ञानावरची राख झटकताना संतांनी प्रामुख्याने कर्मयोगाचाच अंगार फुलवला. कबीर, ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ, चोखामेळा यांनी शिकवला तो आत्मगौरवातून उभा राहणारा कर्मवादच. गेल्या शतकातही विवेकानंद, टिळक,अरविंद, गांधीजी, विनोबा, गाडगेबाबा यांनीही हाच कर्मयोग वेगवेगळ्या परिभाषेत मांडला.

तुकारामांनी या अभंगात आपल्या नेहमीच्य पद्धतीने रोकडा कर्मवाद मांडला आहे. योग्य अयोग्य हे असं आहे. आता तुम्हीच काय करायचं ते ठरवा असं सांगणारा हा तुकोबाचा कर्मवाद… आणि गांधीबाबाचाही.

पुण्य पर उपकार पाप ती परपीडा । आणिक नाही जोडा दुजा यासी ।।

सत्य तो चि धर्म असत्य ते कर्म । आणिक हे वर्म नाही दुजे ।।

गति ते चि मुखी नामाचे स्मरण । अधोगती जाण विन्मुखते ।।

संताचा संग तो चि स्वर्गवास । नर्क तो उदास अनर्गळा ।।

तुका म्हणे उघडे आहे हित घात । जयाचे उचित करा तैसे ।।

Merit consists in doing good to others, sin in doing harm to others.

There is no other pair comparable to this.

Truth is the only religion (or freedom); untruth is bondage,

there is no secret like this.God’s name on one’s lips is itself salvation,

disregard (of the name)know to be perdition.

Companionship of the good is the only heaven,studious indifference is hell.

Tuka says: It is thus clear what is good and what is injurious, let people choose what they will.

गांधीजींना मराठी येत होतं का, बहुधा नव्हतंच. महाराष्ट्रात त्यांचं अनेक वर्षाचं वास्तव्य, मराठीचं गुजराती-हिंदी-संस्कृतशी असलेलं साम्य यामुळे त्यांना निदान मराठी कळत असावं, असं  मानता येईल. असं असतानाही त्यांनी तुकारामांच्या गाथेमधल्या शेकडो अभंगांमधून अवघे सोळा अभंगांची केलेली निवड निव्वळ अप्रतिम आहे.

तुकारामांच्या अभंगांचे अनुवाद आश्रम भजनावलीसाठी आहेत.  त्यातून गांधीजींचं सगळं तत्त्वज्ञान आणि संस्कार स्पष्ट होतात. गांधीजींनी आपले वाटतील ते ते अभंग यात निवडले आहेत. त्यामुळे तुकोबांच्या अभंगांची निवड एवढी उत्तम झाली असावी.

अर्थात या अभंगांचे अर्थ समजून घेण्यासाठी त्यांना अनेकांची मदत झाली असेलच. महादेवभाई देसाई, स्वामी आनंद, काका कालेलकर, विनोबा,किशोरीलाल मश्रूवाला या गांधीजींच्या सगळ्या सावल्यांना मात्र मराठी उत्तम येत होतं. त्यापैकी काहीजण अनुवादाच्या प्रसंगी येरवड्यालाही सोबत होते. पण त्यांनी शब्दांचे अर्थ सांगितले असतील, या हृदयीचे त्या हृदयीपर्यंत पोहोचलेला भाव ट्रान्स्लेट होण्यासाठी हवं असतं अद्वैत. ते या दोन महात्म्यांमध्ये निश्चित होतं.

लगेच आठवणारे तुकारामांचे बहुतेक अभंग या सोळा अभंगांमध्ये सापडतात ते उगाच नव्हे! उदाहरणार्थ पुढे गाणं म्हणून गाजलेला, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती हा अभंग.

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती । चालविसी हात धरुनिया ।।

चालो वाटे आम्ही तुझाचि आधार । चालविसी भार सवे माझा ।।

बोलो जाता बरळ करिसी ते नीट । नेली लाज धीट केलो देवा ।।

अवघे जन मज जाले लोकपाळ । सोइरे सकळ प्राणसखे ।।

तुका म्हणे आता खेळतो कौतुके ।जाले तुझे सुख अंतर्बाही ।।

Wherever I go, Thou art my companion.

Having taken me by the hand Thou movest me.

I go alone depending solely on Thee.

Thou bearest too my burdens.

If I am likely to say anything foolish,

Thou makest it right.

Thou hast removed my bashfulness and madest me self-confident,

O Lord. All the people have become my guards, relatives and bosom friends.

Tuka says: I now conduct myself without any care.

I have attained divine peace within and without.

तुकारामांचा गांधीजींच्या एकूणच व्यक्तिमत्त्वावर प्रभाव होता. त्यांना प्रत्यक्ष पाहिलेल्यांनीही तो प्रभाव नोंदवलाही आहे. ‘लोकमान्य टिळक यांच्या आठवणी व आख्यायिका’ नावाचं सदाशिव विनायक बापट यांचं पुस्तक आहे. त्यात १९१७ सालच्या आठवणींमध्ये त्यांनी लिहिलं आहे, ‘आश्रमाची सर्व व्यवस्था पाहून आम्ही परत येत असता निम्या वाटेवर महात्माजी आश्रमाकडे चालले आम्हास भेटले. भगवद्भक्त श्री तुकोबाप्रमाणे ती शांत वैराग्यमूर्ती डोक्यास गुजराथी पांढरे पागोटे घालून अंगात खादीचा अंगरखा घातलेली अनवाणी येत असलेली आम्ही दुरून पाहिली‘.

लोकमान्यांच्या प्रभावात असलेल्या बापटांचे हे निरीक्षण आहे, हे विशेष. वास्तविक टिळकवादी बड्या नेत्यांनी गांधीजींना कधीच आपले मानले नाही. उलट राष्ट्रीय लढ्याचे केंद्र पुण्यातून हलले याविषयी कायम हळहळ व्यक्त केली. त्यात ब्राह्मण बहुजन असा संघर्षाचाही एक पदर होता. त्यातून मग गांधीजींवर विखारी टीका झाली.

असं असलं तरी गांधीजींना टिळकांविषयी प्रचंड आदर होता. आपल्या महाराष्ट्रयात्रेचे वर्णन करताना त्यांनी लिहिलं आहे, जिथे लोकमान्य टिळक महाराजांचा जन्म झाला. आधुनिक युगाचे नायक असलेले शिवाजी महाराजांची जी भूमी आहे. जिथे तुकारामांनी आपले कार्य केले. ती महाराष्ट्राची भूमी माझ्यासाठी तीर्थक्षेत्राइतकीच पवित्र आहे… महाराष्ट्राने एकदा ठरवलं की तो कोणतीही अशक्य गोष्ट वास्तवात उतरवू शकतो, असं मी नेहमीच म्हणतो.

वादाचे, कार्यपद्धतीतले फरक असले तरी टिळक आणि गांधी या दोन्ही महापुरुषांमधले अद्वैतही आगळे होते. त्यामुळेच तर टिळकांच्या नेतृत्त्वाची धुरा गांधीजींनी यशस्वीपणे खांद्यावर घेतली. दोघांच्याही तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान श्रीमद्भगवद्गीताच होते. गांधीजींवर तुकारामांचा प्रभाव होता. टिळकांवरही तो होताच होता. गीतारहस्याची सुरुवात तुकोबांच्याच अभंगाने झाली आहे. गीतारहस्यात तुकोबांचे एकूण २३ अभंग आहेत. टिळक आणि गांधी उपकारे देह कष्टवणाऱ्या या दोन विभूती होत्या.

काय वाणू आता न पुरे हे वाणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ।

थोरीव सांडिली आपुली परिसे । नेणे सिवों कैसे लोखंडाशी ।

जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती । देह कष्टविती उपकारें।

भूतांची दया हे भांडवल संतां । आपुली ममता नाहीं देही ।

तुका म्हणे सुख पराविया सुखें। अमृत हे मुखे स्रवतसे ।

How now shall I describe (the praises of the good);

my speech is not enough (for the purpose).

I therefore put my head at their feet.

The magnet leaves its greatness and does not know that it may not touch iron.

Even so good men’s powers are for the benefit of the world.

They afflict the body for the service of others.

Mercy towards all is the stock-in-trade of the good.

They have no attachment for their own bodies.

Tuka says: Others’ happiness is their happiness; nectar drops from their lips.

१०

आपल म्हणजे भारतीय अध्यात्म म्हटल की जगण्यापासून पळून गेलेला जंगलामध्ये ध्यान लावून बसलेला साधुबुवा आठवतो. मोक्ष हेच आपल्या अध्यात्माचे अंतिम ध्येय, मग समष्टीचा, समाजाचा त्याच्याशी काय संबंध, अस वाटत खर. पण जगन्मिथ्या मानणाऱ्या शंकराचार्यांनी भारतभर चारदा परिक्रमा का केली? भवसागर पार करण्याविषयी बोलणाऱ्या संतांनी सर्वसामान्यांची काळजी का वाहिली?

मला मुक्ती नको, असं रोकडेपणे सांगणारा तुकोबा या प्रश्नांची अगदी खणखणीत उत्तर देतात. आजच्या अभंगात हे उत्तर अगदी सविस्तर आहे. नाहीतर आधीच्या वाक्यात ‘बैसला गोविंद जडोनिया चित्ती’ म्हणणारा तुकाराम पुढच्याच वाक्यात’बळबुद्धी त्याची उपकारासाठी’ कसे सांगतात ? चित्ती गोविंद जडवण्यासाठी बळबुद्धी उपकारासाठी वापरण्याचं हे अध्यात्म आहे. हे आर्मचेअर तत्त्वज्ञान नाही, जीवनाचं,जगण्याचं आणि मातीशी जोडलेलं तत्त्वज्ञान आहे.

भवसागरातून पार व्हायचं आहे, हे खरं. पण त्यासाठी संसार सोडून संन्यास नको. उलट सुखी संसारच हवा. आपले देव, ऋषी, आचार्य, संत सगळे बहुतांशी संसार करणारे आहेत.सगळ्या महापुरुषांनी लोकांमध्ये लोकांसारखं राहुन लोकांमधला राम जागवून रामाला आपल्याशी जोडण्याचे काम त्यांनी केलं. रामाचे काम करण्याचा त्यांचा मार्ग हाच होता आणि हाच मार्ग असू शकतो. तुकाराम आणि गांधीजी दोघांचीही आयुष्य याला साक्ष आहेत.

मुक्तिपांग नाही विष्णुचिया दासा । संसार तो कैसा न देखती ।।

बैसला गोविंद जडोनिया चित्ती ।आदि तेचि अंती अवसान ।।

भोग नारायणा देऊनि निराळी । ओविया मंगळी तोचि गाती ।।

बळबुद्धी त्यांची उपकारासाठी । अमृत ते पोटी साठवले ।।

द्यावेत तरी देवा च सारिखी । आपुली पारखी नोळखती ।।

तुका म्हणे त्यांचा जीव तोचि देव । वैकुंठ तो ठाव वसती तो ।।

To the servants of Vishnu there is no yearning even for salvation;

they do not want to know what the wheel of birth and death is like.

Govind sits steadily settled in their hearts; for them the beginning and the end are the same.

They make over happiness and misery to God and themselves remain untouched by them,

the auspicious songs sing of them.

Their strength and their intellect are dedicated to benevolent uses;

their hearts contain gentleness.

They are full of mercy even like God; they know no distinction between theirs and others’.

Tuka says: They are even like unto God and Vaikuntha is where they live.

११

आजकाल साधू आणि संत म्हणवून घेणाऱ्यांचे मठ आणि आखाडे एकमेकांविरुद्ध खरोखरच्या आखाड्यात उभे असल्यासारखे झगडत असतात. त्यांच्यात वर्षानुवर्षं कोर्टकेस सुरु असतात. साधुबोवांना सिक्युरिटी घेऊन फिरावं लागतं. असे आपल्या संतसमाज वगैरे युनियन बनवणारे हे संत खऱ्या संतांना कसं काय ओळखू शकणार. खरा भक्तच दुसऱ्या भक्ताला ओळखू शकतो.

म्हणून तर विठ्ठलाचे समकालीन भक्त एकटेदुकटे नाही, तर मांदियाळीने फिरत आलेले दिसतात. त्यांनी एकत्र यात्रा केलेल्या आहेत. एकमेकांशी चचेर्तून,एकमेकांच्या व्यक्तित्वातून प्रेरणा घेत विकसित झालेले आहेत. भगवंताच्या आणखी जवळ गेले आहेत. कधी ज्ञानोबांच्या प्रभावातून नामदेवांनी गुरु करण्याचा निर्णय घेतलेला दिसतो, तर त्याचवेळेस नामदेवांमुळे ज्ञानेश्वर योगाच्या प्रभावातून बाहेर पडून भक्तीकडे आलेले दिसतात. याचमुळे ज्ञानेश्वरांपासून आजपर्यंत वारकरी संप्रदायाने सदैव आपल्या पूर्वसूरींकडे केवळ आदराने पाहिलेले आहे.

फक्त आपल्या संप्रदायातीलच नाही, तर अन्य संप्रदायांतील संतांशी या संतांचं फार सौहार्दपूर्ण संबंध होते. नामदेव, तुकाराम, एकनाथ हे तर सुफी संतांशीही अगदी आपलेपणाचे वागल्याचे दाखले आहेत.

भक्त ऐसे जाणा जे देहीं उदास । गेले आशापाश निवारुनि ।।

विषय तो त्यांचा जाला नारायण ।  नावडे धन जन माता पिता ।।

निर्वाणी गोविंद असे मागेंपुढें ।  कांहीच सांकडे पडो नेदी ।।

तुका म्हणे सत्य कर्मा व्हावें साहे । घातलिया भये नरका जाणें ।।

He is a devotee who is indifferent about body, who has killed all desire,

whose one object in life is (to find) Narayana,

whom wealth or company or even parents will not distract,

for whom whether in front or behind there is only God in difficulty,

who will not allow any difficulty to cross his purpose.

Tuka says: Truth guides such men in all their doings.

१२

गांधीजींच्या लिखाणात , वक्तव्यांत तुकारामांच्या उल्लेख अनेकदा आलाय. गांधींचे समग्र साहित्य इंटरनेटवर उपलब्ध आहे , त्यात ‘ तुका ‘ असा सर्च दिला ,की अनेक संदर्भ समोर येतात.

त्यातला महत्त्वाचा संदर्भ वाईच्या भाषणाचा आहे. त्यात असहकार आंदोलनाची तात्त्विक भूमिका समजावून सांगताना त्यांनी तुकारामांचा दाखला दिला आहे. त्यात गांधीजींना ‘ कठीण वज्रास भेदू ऐसे ‘ आणि ‘ नाठाळाच्या माथी हाणू काठी ‘ सांगायचं असावं , असं वाटतं. महाराष्ट्रयात्रेच्या संदर्भात त्यांनी तुकोबांचा केलेला उल्लेख याच सदरात पूवीर् एकदा आला आहे.

पुढे हरिजनांच्या सभेसमोर हिंदूधर्माचं मोठेपण सांगताना त्यांनी हा ज्ञानेश्वर आणि तुकारामांचा धर्म असल्याचे सांगितले आहे. हा धर्म चिरकाल टिकणार आहे ,असं त्यांनी पुढे म्हटलं आहे. आंबेडकरांच्या धर्मांतराकडे आकर्षणाऱ्या दलितांना हिंदूधर्मात ठेवण्याची गांधीजींची कळकळ होती. कदाचित त्याचाही संदर्भ याला असू शकेल. याच भाषणात दाक्षिणात्य संत थिरुवल्लुवर यांची तुलना केवळ तुकारामांशीच होऊ शकते , असं सांगत ते तुकोबाचं मोठेपण अधोरेखित करतात.

बंगालहून पाठवलेल्या एका पत्रात गांधीजी देवाच्या अवतारांविषयी लिहितात. तुकाराम , ज्ञानेश्वर , नानक , कबीर हे दैवी अवतार नव्हते का , असा सवाल त्यांनी विचारला आहे. गावांच्या विकासासाठी काम करणाऱ्या तरुणांनी तुकारामासारख्या संतांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी , असा सल्लाही त्यांनी दिला आहे. तसेच गोपुरी आश्रमातील एका अंत्यसंस्काराच्या वेळी आपल्या आग्रहानंतर विनोबांनी तुकारामांचा अभंग गायल्याची आठवणही त्यांनी एका प्रार्थनासभेत सांगितली आहे. तसेच आणखी एका अशाच प्रार्थनासभेत बाळासाहेब खेर आणि ठक्करबापांच्या उपस्थितीत त्यांनी तुकारामांचा ‘ पापाची वासना नको दावूं डोळा ‘ हा आवडता अभंग उद्धृत केला आहे.

डॉ. इंदुभूषण भिंगारे यांनी तुकाराम गाथेचं हिंदी भाषांतर केलं होतं. त्याची एक छोटी प्रस्तावना गांधीजींनी लिहिली आहे. आपल्याला फारसं मराठी येत नसलं तरी मला तुकाराम खूप प्रिय आहे , असं त्यांनी यात आवर्जून लिहिलं आहे. या गाथेसाठी त्यांनी शांतिनिकेतनातून खास तुकारामांचं चित्र काढून घेतलं होतं. गांधीजींनी अनुवादित केलेला तुकोबाचा आणखी एक अभंग.

न कळता काय करावा उपाय । जेणे राहे भाव तुझ्या पायी ।।

येऊनिया वास करिसी हृदयी । ऐसं घडे कई कासयाने ।।

साच भावे तुझे चिंतन मानसी । राहे हे करिसी कैं गा देवा ।।

लटिके हे माझे करुनिया दुरी । साच तू अंतरी येउनि राहे ।।

तुका म्हणे मज राखावे पतिता। आपुलिया सत्ता पांडुरंगा ।।

When one does not know, what is one to do so as to have devotion to Thy sacred feet?

When will it so happen that Thou wilt come and settle in my heart?

O God, when wilt Thou so ordain that I may meditate on Thee with a true heart?

Remove Thou my untruth and, O Truth, come and dwell Thou in my heart.

Tuka says: O Panduranga, do Thou protect by Thy power sinners like me.

१३

‘नेमिले या चित्तापासुनिया ‘ चा इंग्रजी अनुवाद करताना गांधीजींनी मेडिटेट असा शब्द वापरला आहे. मेडिटेशन म्हणजे ध्यान. त्याचा थेट संबंध चित्ताशी आहे. चित्तामधले तरंग नाहीशे करणे म्हणजे योग , असं भगवान पतंजली सांगतात. ध्यान त्या योगाची एक पायरी. त्यामुळे चित्त म्हणजे योग असं समीकरण बांधलं गेलं आहे.

भगवान पतंजलींनी सांगितलेला योग देव मानणारा आहे की नाही , यावर बरीच मतमतांतरे आहेत. पण असे वाद पुस्तकं लिहिणाऱ्या विद्वानांसाठी असतात किंवा मग डॉक्टरेट मिळवणाऱ्यांसाठी तरी. तुकारामांच्या काळी डॉक्टरेट नव्हती. मग असे लोक शास्त्रार्थाचा किस पाडत मोठे पंडित बनत. त्यातलेच मग तुकारामांना गाथा इंद्रायणीत बुडवण्याचे फतवे काढत. आता इंटरनेटवर एक सर्च मारला की जगभरची विद्वत्ता आपल्या बोटांजवळ येऊन पडते. या ग्लोबल जगात अशा पंडितांची दुकानं बंद पडली आहेत , हे बरं झालंय. पण सर्च मारून मंबाजी होता येईल ,तुकाराम नाही.

तुकारामांना या अशा वादांशी काही घेणंदेणं नव्हतं. तत्त्वज्ञानासाठी त्यांचं जीवन नव्हतं. त्यांच्या जीवनात तत्त्वज्ञान जगायचं होतं. त्यामुळे मग त्यांचा योग त्यांच्या पांडुरंगाशीच होता. योग म्हणजे जोडलं जाणं. ते पूर्णपणे पांडुरंगाशी जोडले गेले होते. तुकारामांनी पतंजलींनी लिहिलेली थिअरी अभ्यासली असेलही ,नसेलही. पण त्याने काय फरक पडतोय. ते ती थिअरी प्रॅक्टिकलमधे आणत होते. किंबहुना पतंजलींनी त्यांच्या भोवतालच्या तुकारामांसारख्या योग्यांच्या जीवनातच आपली सूत्र शोधली असतील.

पतंजलींचं एक भन्नाट योगसूत्र आहे , ‘ वीतरागविषयं वा चित्तम् ‘.संतांना आपल्या चित्ताचा विषय बनवा , असा त्याचा साधा अर्थ. आपण ज्यांच्याविषयी विचार करतो , तसे बनतो. संतांचा विचार करा , त्यांच्यासारखे व्हाल. पण रोजच्या व्यवहारातही हे तुकड्या तुकड्यात वापरता येण्याजोगं तत्त्वज्ञान आहे. कॉपोर्रेट जगात आपल्याला एखादा गुण आपल्यात हवा , असं वाटतंय. मग तसा रोजच्या पाहण्यातला माणूस शोधा. त्याचं बारीक निरीक्षण करा. त्या माणसाच्या त्या गुणासंबंधी विचार करून बघा. आपल्यात त्याच्यातला तो गुण कमीअधिक कधी येईल ते कळत पण नाही.

माणसंच आपल्याला शिकवत असतात. पुस्तकं नाहीत. पुस्तकांनी शिकवलं असं वाटलं , तर बारकाईनं विचार करा. बहुतेक त्या पुस्तकातल्या माणसांनीच आपल्याला शिकवलेलं असतं. गांधीजी , तुकाराम असेच शिकले असावेत.

आणिक दुसरे मज नाही आता । नेमिले या चित्तापासुनिया ।।

पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी । जाग्रती स्वप्नी पांडुरंग ।।

पडिले वळण इंदिया सकळां । भाव तो निराळा नाही दुजा ।।

तुका म्हणे नेत्री केले ओळखण । साजिरे ते ध्यान विटेवरी ।।

This heart of mine is determined that for me now there is nothing else;

I meditate on Panduranga, I think of Panduranga,

I see Panduranga whether awake or dreaming.

All the organs are so attuned that I have no other desire left.

Tuka says: My eyes have recognized that image standing on that brick transfixed in meditation unmoved by anything

१४

आतापर्यंत एकही राष्ट्रपती किंवा पंतप्रधान बनलेला नाही , अशी दोन महत्त्वाची राज्यं कालपर्यंत होती , एक महाराष्ट्र आणि दुसरं बंगाल. आज प्रतिभा पाटलांनी शपथ घेतली की महाराष्ट्र या यादीतून गळेल. या दोन राज्यांत अनेक साम्य असली तरी राष्ट्रपती-पंतप्रधान नसणं , हा निव्वळ योगायोग नाही.

या दोन्ही राज्यांनी गेल्या दोनशे वर्षांत एकमेकांवर खूप प्रभाव पाडलाय. बंगालचा आपल्या संस्कृती साहित्यावरचा प्रभाव आपल्याला ठावूक आहेच. पण महाराष्ट्राचा प्रभावही बंगालवर आहे. गुरुदेव रवींदनाथ टागोरांनी शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या बंगाली कवितेचा पुलंनी केलेला अनुवाद शाळेच्या पुस्तकात अभ्यासालाच आहे. पण गुरुदेवांच्या तोडीचेच महाकवी असणाऱ्या अरविंद घोषांनी आपल्या पल्लेदार इंग्रजीत एक दीर्घकविता केलीय , कोणावर माहीतेय , बाजीप्रभूंवर.

गुरुदेव टागोरांवर तुकारामांचाही प्रभाव होता. त्यांनी तुकारामांचे बारा अभंग बंगालीत अनुवादितही केले आहेत.गुरुदेव आणि गांधीजींचे अगदी घनिष्ट संबंध होते. पण गुरुदेवांना तुकाराम आधीपासूनच माहीत होता. भारतातील पहिले आयसीएस आणि वडील बंधू सत्येंदनाथांमुळे रवींदनाथ तुकारामांकडे आकषिर्ले गेले.

गांधीजींमुळे गुरुदेवांच्या अगदी जवळच्या एका कलाकाराला तुकाराम कळला. तो कलाकार म्हणजे नंदलाल बोस. ते जागतिक कीतीर्चे चित्रकार. जगभर त्यांची प्रदर्शने भरली होती. तीस वर्ष त्यांनी शांतिनिकेतनातल्या कलाभवनचं प्रमुखपद भुषवलं. गांधीजींनी त्यांना तुकारामाची चित्र काढण्याची विनंती केली होती. डॉ. इंदूभुषण भिंगारेंनी तुकारामांच्या अभंगांचं ‘ तुकाराम की राष्ट्रगाथा ‘ या नावाने हिंदी भाषांतर केलं होतं. त्याला गांधीजींनी प्रस्तावना लिहिली आहे. आणि या पुस्तकात तुकारामांची चांगली चित्रं छापून यावीत म्हणून नंदलाल बोसांकडून चित्रं काढून घेतली. यात पुस्तकात बोसांची तीन चित्रे आहेत.या तुकारामाला गांधीजी ,रवींदनाथ आणि नंदलाल बोस अशा तीन दिग्गजांचा स्पर्श असल्याचा विचार डोक्यात येतो. आणि मग हा तुकाराम वेगळाच वाटू लागतो.

न मिळो खावया न वाढो संतान । परि हा नारायण कृपा करो।।

ऐसी माझी वाचा मज उपदेशी । आणि लोकांसी हेचि सांगे।।

विटंबो शरीर होत का विपत्ती । परि राहो चित्ती नारायण।।

तुका म्हणे नासिवंत हे सकळ । आठवे गोपाळ तेचि हेत।।

What though I get nothing to eat and have no progeny? I

t is enough for me that Narayana’s grace descends upon me.

My speech gives me that advice and says likewise to the other people.

Let the body suffer; let adversity befall one,

enough that Narayana is enthroned in my heart.

Tuka says: All the above things are fleeting; my welfare consists in always remembering Gopal.

१५

आषाढी एकादशीच्या निमित्ताने अवघा महाराष्ट्र ग्यानबा तुकारामाच्या गजरात डोलत असताना , आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये तुकारामाचे शब्द ऐकू आले. नव्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी आपल्या पहिल्या भाषणात तुकारामांचा अभंग सांगितला. जे का रंजले गांजले…

विठ्ठलमुक्तीला साठ वर्ष होत असताना महाराष्ट्राची लेक देशातील सवोर्च्च पदावर बसते , हा एक आनंददायी योगायोग आहे. आणि तेव्हा ती लेक आपल्या भाषणात तुकाराम , गांधीजी आणि आंबेडकर या तिघांची नावं घेते ,यापरता आनंद तो काय.

मावळते राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनाही तुकाराम माहित आहे. त्यांनीही त्यांच्या ‘ विंग्ज ऑफ फायर ‘ या प्रसिद्ध पुस्तकात तुकारामांचा अभंग दिलाय. बहुधा पद्मभूषण मिळाल्यानंतरचा आनंद व्यक्त करताना त्यांनी लिहिलंय , आनंदाचे डोही आनंद तरंग. या प्रकरणाचा हिंदीतला अनुवाद करताना प्रख्यात कवी गुलजारांनी या अभंगाचाही गोड हिंदी अनुवाद केला आहे. तो अगदी मिळवून वाचण्यासारखा आहे.

लागोपाठ दोन राष्ट्रपतींवरचा तुकारामांचा प्रभाव हा काय फक्त एक योगायोग मानायचा ?

हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ।।

गुण गाईन आवडी । हेचि माझी सर्व जोडी ।।

न लगे मुक्ती आणि संपदा ।  संतसंग देई सदा ।।

तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हासी ।।

O God, grant only this boon. I may never forget Thee; and I shall prize it dearly. I desire neither salvation nor riches nor prosperity; give me always company of the good. Tuka says: On that condition Thou mayest send me to the earth again and again.

१६

सामाजिक परिवर्तनाचा रथ गांधीजींनी आणि त्यांच्या अनुयायांनी पुढे नेला.  साने गुरुजींनी विठ्ठलमंदिराची मुक्तीचा दिलेला यशस्वी लढा याचं खणखणीत उदाहरण आहे.

विठ्ठलमुक्ती आंदोलनाचा यंदा हिरकमहोत्सव. विठ्ठलमंदिरात कथित अस्पृशांना प्रवेश मिळाला त्याला या १० मे रोजी साठ वर्षं पूर्ण झाली. दलितांच्या मंदिरप्रवेशासाठी एक ब्राम्हण नेता आपला जीव पणाला लावतो. आपल्याच जातीतल्या कट्टरांशी भांडतो. त्याच्या पाठिशी उभे राहतात तेही बहुसंख्य ब्राम्हणच. ही भारताच्या इतिहासातली एक फार मोठी घटना आहे. साने गुरुजींच्या दहा दिवसांच्या उपोषण काळात सेनापती बापट , आचार्य अत्रे , अच्युतराव पटवर्धन ,दादासाहेब मावळंकर , बबनराव बडवे , पांडुरंग उत्पात , तात्या डिंगरे अशा ब्राम्हण पुढाऱ्यांनी आपली सारी पुण्याई चंदभागेच्या वाळवंटात उभी गुरुजींच्या मागे पुढे केली.

साने गुरुजी गांधीजींचं तत्त्वज्ञान आणि आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच लढत होते. पण बडव्यांनी एका गांधीवादी पुढाऱ्याला गाठून गांधीजींना या आंदोलनाबद्दल गैरसमज करून दिले. त्यामुळे गांधीजींनी गुरुजींना उपोषण मागे घेण्याची तार केली. पण गुरुजी हाडाचे गांधीवादी. सत्य आपल्या सोबत असल्याचा पूर्ण विश्वास असल्याने त्यांनी गांधीजींचा आदेशही धुडकावून लावला. लोकसभेचे पहिले अध्यक्ष दादासाहेब मावळंकर यांनी गांधीजींचे गैरसमज दूर केल्यावर मात्र त्यांनी पाठिंबा दिला. त्यानंतर लागलीच पावलं उचलली गेली आणि विठ्ठलमंदिर सर्वांसाठी खुले झाले.

तुकोबाच्या विठोबाची मुक्ती करण्यासाठी गांधीजींचं तत्त्वज्ञान धावलं. पण मुळात ते तत्त्वज्ञान तुकोबांच्या तत्त्वज्ञानापेक्षा वेगळं कुठे होतं ?

शेवटची विनवणी । संतजनीं परिसावी ।।

विसर तो न पडावा । माझा देवा तुह्यांसी ।।

पुढे फार बोलो काई । अवघे पायी विदित ।।

तुका म्हणे पडिलो पाया । करा छाया कृपेची ।।

This is my last prayer, saintly people listen to it,:

God, do not forget me; now what more need I say,

Your holy feet know everything.

Tuka says: I prostrate myself before Your feet,

let the shadow of Your grace descend upon me.

गोविंद तळवलकर , सौजन्य – मटा

(लेख ३ जाने २००८ रोजी प्रकाशित झाला होता.)

इतिहासातील सनावळ्यांनी अनेक महत्त्वपूर्ण घटनांची नोंद घेतलेली असते. त्या घटनांनी अर्थातच त्या त्या काळात दूरगामी परिणाम घडवलेले असतात. मग ती ब्रिटिश साम्राज्याचा भारतात पायाघालणारी प्लासीची लढाई असो की १८५७चे भारतीय स्वातंत्रयुद्ध असो , आज तेथपासून अणुयुगापर्यंत झालेल्या प्रवासात त्या घटनांचे महत्त्व कितपत उरले आहे ,असा प्रश्न पडू शकतो. अडीचशे वर्षांतील अशा घटनांचा अभ्यासपूर्ण आढावा.

ब्रिटिशांच्या भारतातील साम्राज्याचा पाया ज्या प्लासीच्या लढाईने घातला , तिला यंदा अडीचशे वषेर् पूर्ण झाली. त्याचबरोबर १८५७च्या उठावाला आणि मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेस दीडशे वषेर् झाली असून , लोकमान्य टिळकांच्या दीडशेव्या जन्मतिथीची सांगताही या वषीर्च झाली.

अखिल भारतीय काँग्रेसमध्ये पहिली मोठी फूट पडल्याला या डिसेंबरमध्ये शंभर वषेर् होतात आणि रशियन क्रांतीला नव्वद. महात्माजींनी दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रह सुरू केला , तो शंभर वर्षांपूवीर् सप्टेंबरमध्ये. आणखी एक महत्त्वाची घटना म्हणजे अमेरिकन स्वातंत्र्य युद्धात अमेरिकनांचा पराभव होण्याची शक्यता निर्माण झाली असता , ज्याच्या प्रयत्नांमुळे फ्रेंचांनी अमेरिकेस लष्करी मदत पाठवली , त्या लाफाए याच्या जन्मास याच वषीर् अडीचशे वषेर् पूर्ण होतात.

या सर्व घटनांचा आजच्या दैनंदिन जीवनाशी संबंध येत नाही. तथापि ऐतिहासिक घटनांपासून काही निष्कर्ष निघतात आणि त्यांपासून काही धडेही घ्यायचे असतात. इतिहासाची पुनरावृत्ती होत नाही ; पण काही प्रवृत्ती , उणीवा इत्यादींची मात्र होते.

प्लासीची लढाई आणि १८५७चा उठाव या दोन्ही वेळी हिंदी लोकांचे अंगभूत दोष सारखेच होते , असे दिसून येईल. दोन्ही वेळी सामाजिक शिस्तीचा अभाव होता आणि मध्यवतीर् सत्ताकेंद नव्हते. शिवाजी महाराजांच्या उदयकाळीही या प्रकारची परिस्थिती होती. आज्ञापत्रात म्हटले आहे- ‘ कोणाचा अन्याय न करावा ही यांची बुद्धीच नाही. बळकट व्हावे ;दुसऱ्याचे घ्यावे ; दावेदरवडे करावे हा त्यांचा सहज हव्यास. राज्यशासन येईल हे जाणोन , हे अगोदरच दुसऱ्याचा आश्रय करतात. देश मारितात- परचक्र आले म्हणजे वतनाच्या आशेने अगोदरच सलुख करतात. तिकडील भेद इकडे व इकडील भेद तिकडे करून राज्यात शत्रूचा प्रवेश करतात.’

प्लासीची लढाई होण्यास बंगालचा नवाब सिराज उद्दौलाचा उद्दामपणाचा कारभार तसेच फंदफितुरी कारणीभूत होती. त्याचा आजोबा अलिवदीर् खान याने त्याला वारस ठरवले , हे अलिवदीर्खानाची मुलगी- घसिटा बेगम हिला मान्य नव्हते. सरसेनापती मिर जाफर हा राज्य मिळवण्यास अधीर होता. सिराजच्या कारभारावर व्यापारी मंडळी नाराज होती आणि त्यांचे नेतृत्व करत होता महताब चंद. हा सावकारी व व्यापारी करत असे. जगत सेठ या नावाने तो ओळखला जात होता.

सिराजने कोलकाता इथल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यातील किल्ला हस्तगत केल्यामुळे तिच्या व्यापारास ‘ खो ‘ बसला. किल्ला परत घेण्याची तिची आकांक्षा होती. या कामी लाच व फंदफितुरी करण्यासाठी कंपनीला जगत सेठ व इतर व्यापाऱ्यांचा उपयोग झाला. सिराज व मिर जाफर यांच्यातील स्पधेर्चा फायदा घेऊन मिर जाफरला कंपनीकडे वळवण्यासाठी जगत सेठ यास फार सायास पडले नाहीत.

ईस्ट इंडिया कंपनीने रॉबर्ट क्लाइव्ह याची कोलकातातील किल्ला ताब्यात घेण्याच्या मोहिमेचा प्रमुख म्हणून नेमणूक केली. सिराजची राजधानी मुशिर्

दाबाद इथे होती. त्याने प्लासीपाशी सैन्यासह तळ टाकला. बंगालीत या छोट्या गावाचे नाव आहे पोलाशी किंवा पलाशी. पोलाशी म्हणजे पळस. पळसाची अनेक झाडे असलेले हे गाव पोलाशी म्हणून ओळखले जाते.

सिराजकडे जवळजवळ पन्नास हजार सैन्य होते ; पण प्रत्यक्ष लढाईत पाच हजारच सहभागी झाले. सिराजला फ्रेंचांच्या ७५ तोफांची मदत होती. ईस्ट इंडिया कंपनीचे सैन्य तीनएक हजार होते. यात एकविसशे हिंदी शिपाई आणि नऊशे ब्रिटिश अधिकारी होते. कंपनीकडे सिराजपेक्षा कमी तोफा होत्या.

‘ प्लासीची लढाई ‘ असे म्हटले जात असले तरी लढाई म्हणावी अशी काही झाली नाही. सिराजच्या सैन्याने २३ जून १७५७ रोजी सकाळी सातला तोफा डागल्या. तथापि , क्लाइव्हचे सैन्य दूर असल्यामुळे ते तोफांच्या माऱ्यात आले नाही. दुपारी बारा वाजल्यानंतर तास-दीड तास पाऊस पडला. कंपनीने आपल्या तोफा व दारूगोळा झाकून ठेवण्याची दक्षता घेतली , तशी फ्रेंचांनी घेतली नाही. सिराजचा तोफखाना पावसामुळे निकामी झाला , हे क्लाइव्हला समजले नव्हते. पण सिराजचा तोफखाना बंद असल्याचे पाहून त्याने चढाई केली , तेव्हा सिराजच्या सैन्याने पळ काढला. मिर जाफर मदतीला आला नाही. सिराजचे बरेचसे सैन्य लढलेच नाही आणि त्याचे बरेच नुकसान झाले. मग क्लाइव्हने मिर जाफर नवाब म्हणून मान्य केला. कंपनी आणि क्लाइव्हसह सर्व इंग्रज अधिकारी यांना बरीच लूट मिळाली.

क्लाइव्ह कोलकात्यात विजयी वीर म्हणून आला. त्याचे स्वागत करणाऱ्यांत राजा नबकृष्ण देव हे सावकार व इतर तत्सम लोक पुढे होते. पळसाची पाने लालभडक असतात. प्लासीच्या लढाईनंतर ब्रिटिशांचा साक्षात कारभार जिथे होता , तो भाग नकाशात लाल रंगाने दाखवला जाऊ लागला आणि अंकित अशा संस्थानिकांच्या ताब्यातील भाग पिवळ्या.

यानंतर शंभर वर्षांनी कंपनीच्या विरुद्ध उठाव झाला. पहिले स्वातंत्र्ययुद्ध असा त्याचा गौरव आज केला जातो. तथापि त्यानंतर लगतच्या काळात इतिहासाचार्य राजवाडे ,वासुदेवशास्त्री खरे , शेजवलकर इत्यादींनी या उठावाची कठोर चिकित्सा केली होती. त्यांनी सतत ‘ बंड ‘ हाच शब्द वापरला. विष्णुशास्त्री चिपळूणकर हे देशाभिमानी व धर्माभिमानी. त्यांनी ५७ सालच्या बंडाबद्दल लिहिले , ‘ १८५७ साली एकदम साठ पलटणी उठून स्वातंत्र्याचा झेंडा उभारतात. पण या झेंड्यात व इंग्लंड , फ्रान्स ,अमेरिका येथील बंडांत अतिशय अंतर आहे. वरील देशांतील दंगे कराच्या बाबतीत झाले आणि इकडे १८०७ व ५७ साली बंडे झाली , त्यास कारण देशाभिमान बिलकूल नसून केवळ धर्माभिमान होय. आमच्या देशात अभिमान चढवावयाची बाजू कोणती ?तर यज्ञोपवित , गोब्राह्माण इत्यादी. स्वातंत्र्य , जन्मभूमी या शब्दांत वरच्यासारखा प्रभाव प्राच्य देशांत थोडाच आढळतो ?’

इतिहासाचार्य राजवाडे यांनी म्हटल्याप्रमाणे शस्त्र व शास्त्र या जोरावर इंग्रजांनी १८५७च्या बंडात विजय मिळवला. इंग्रजांकडील शस्त्रे ही इंग्लंड व युरोप यांत विकसित होत असलेल्या शास्त्रातून निर्माण होता होती. आपला समाज अध:पतित अवस्थेत (डिकॅडन्ट) होता ; तर त्यांचा वधिर्ष्णू होता. प्लासीनंतर शंभर वर्षांत आपले संस्थानिक व राजे , तसेच त्यांचे प्रधान आणि समाजाचे धुरीण यांना कोणाला कंपनीच्या राज्याचा विस्तार का होत आहे ? त्यांच्यापाशी विद्या आहे ती काय आहे ?त्यांचा देश कसा आहे ? इत्यादी चौकशी करून आपली राज्यव्यवस्था सुधाराविशी वाटली नाही.

युरोपात तिथल्या चर्चने मध्ययुगापासूनच नव्या विद्येचा प्रसार सुरू केला होता. प्राचीन ग्रीक विद्येचा प्रभाव पडून वैचारिक क्रांती झाली व त्यापाठोपाठ धामिर्क सुधारणा होऊ लागल्या. यातून विज्ञानाच्या विविध शाखांत आश्चर्यकारक प्रगती होऊ लागली आणि तंत्रज्ञान विकसित झाले. यातून औद्योगिक क्रांती झाली आणि तिचेच वारस इथे राज्यविस्तार करू लागले.

त्यांना इथे भूमी भुसभुशीत लागली. आपले लोक शौर्यात इंग्रजांना हरणारे नव्हते. पण शिस्तीचा अभाव , जुनाट शस्त्रे आणि लष्करी व्यूहरचनेतील जुनाटपणा याचबरोबर सर्व पातळ्यांवरील नेतृत्वाचा नादानपणा यामुळे पराभव अटळ होता. वासुदेवशास्त्री खरे लिहितात की , ‘ हिंदुस्थान इंग्रजांनी घेतले नसते तर फ्रेंचांनी घेतलेच असते. ‘यासारखे मत कार्ल मार्क्सनेही व्यक्त केले आहे. त्याने इंग्रज साम्राज्यशाहीवर टीका केली खरी ; पण इंग्रजांमुळे भारत आधुनिक युगात येण्यास मदत झाली , असे मत दिले आहे. त्याने असाही सवाल केला की , ‘ ब्रिटिशांनी हिंदुस्थान पादाक्रांत केला नसता तर तुर्क , इराणी वा रशियन यांनी केला असता. ते आपल्याला पसंत पडले असते काय ?’

प्लासीनंतर शंभर वर्षांत इंग्लंड व युरोपमधील क्रांतिकारक स्थित्यंतर इथल्या राज्यर्कत्यांनी समजून घेतले नाही. फ्रेंचक्रांती आणि त्यापूवीर्चे अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध यांनी नुसती राज्यक्रांतीच घडवून आणली नाही , तर नवे विचार प्रसारित केले. थॉमस पेन याने मानवी हक्कांचे महत्त्व प्रतिपादिले आणि अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या प्रमुखांवर त्याचा प्रभाव होता. अमेरिकन प्रजासत्ताकाचे प्रणेते वॉशिंग्टन , जेफर्सन ,हॅमिल्टन , मॅडिसन , फ्रॅन्कलीन , अॅडॅम्स इत्यादींनी प्रजासत्ताकाचे नवे तत्त्वज्ञान तयार केले. फ्रेंचक्रांतीने युरोपमधील सरंजामशाहीचा अंत करण्याची प्रक्रिया सुरू केली. १८५७च्या धुरिणांना याची काहीच कल्पना नव्हती व ती करून घेण्याची उत्सुकताही नव्हती. तसेच असे पर्यायी तत्त्वज्ञान त्यांच्यापाशी नव्हते. नकाशाचे शास्त्रच माहीत नसल्यामुळे सर्व भारताचा नकाशा त्यांच्यापाशी नव्हता , मग जगाचा कोठला असणार? कोपरनिकस , गॅलिलिओ , न्यूटन इत्यादींच्या वैज्ञानिक शोधांमुळे औद्योगिक क्रांतीला प्रेरणा मिळाली आणि विविध ज्ञानशाखा प्रगत होत गेेल्या. हे सर्व संचित ज्यांच्या मागे उभे होते त्यांच्यापुढे हरिविजय आणि पांडवप्रताप यांची पारायणे करणाऱ्यांचा प्रभाव पडणे अशक्य होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अद्ययावत व परंपरागत अशा दोन शब्दांत या दोन संस्कृतींचे वर्णन केले असून परंपरागत संस्कृतीचा पराभव अटळ मानला.

वास्तविक उठाव करण्यात इंग्रजांच्या सैन्यातल्या शिपायांचा पुढाकार होता आणि संस्थानिक व राजेरजवाडे हे शिपायांच्या दबावामुळे उठावात सामील झाले. त्यांपैकी काहींची संस्थाने डलहौसीने खालसा केली नसती , तर ते बंडात सामील झाले नसते. यामुळे ज्या उत्तर भारतात बंडाचा जोर होता , त्यातले अनेक राजे बंडापासून अलिप्त होते. सबंध भारताचा विचार केला , तर फार थोडा प्रदेश बंडात सामील होता आणि ते चालू असताना मुंबईत इंग्रजी विद्या देणारे विद्यापीठ स्थापन झाले.

ज्यांचे शासन खिळखिळे होते , त्यांना उठाव करायचा तर राजकीय व लष्करी या दोन्ही पातळ्यांवर नेतृत्वाची साखळी हवी , याची जाणीव नसावी हे स्वाभाविक होते. तसेच बंड यशस्वी झाले असते तर कोणत्या प्रकारची राज्यव्यवस्था ते आणणार होते ? पुन्हा लहान-मोठी राज्ये देशभर पसरली असती आणि ती एकमेकांशी जमेल तेव्हा लढत बसली असती.

इंग्रजांनी जिथे कारभार सुरू केला होता , तिथल्या व्यापाऱ्यांना शांतता हवी होतीच. पण सामान्य लोकांनाही हवी होती. इंग्रजी शिक्

षणामुळे तयार होत असलेल्या पिढीलाही या विद्येचे महत्त्व वाटू लागले. यामुळे दादाभाई ,भांडारकर , रानडे , सुरेन्दनाथ बॅनजीर् इत्यादी इंग्रजी विद्या आत्मसात करणारे आपले नेते १८५७विषयी फारसे लिहिताना वा बोलताना आढळणार नाहीत. नव्याने मिळालेल्या विद्येकडे ती पिढी आकषिर्त झाली ; पण त्याचबरोबर इंग्रजी राज्यातील दोष आणि आपल्या समाजाची दुरवस्था याबद्दल ती जागरुकही झाली. त्या काळात डॉ. भाऊ दाजी यांच्यासारख्यांची इंग्रजी कारभारावरील टीका बरीच जहाल होती आणि नंतर दादाभाईंनी संपत्तीचा ओघ इंग्लंडकडे कसा जात होता याचे विवेचन केले. हे नव्या विद्येचे फळ होते.

यातून अखिल भारतीय काँग्रेसचा जन्म झाला. प्रतिनिधित्व नाही तर कर नाही , ही अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धातील घोषणा काँग्रेसच्या पहिल्या पिढीच्या नेत्यांनी ऐकली होती. त्यांनी यातला प्रतिनिधित्वाचा भाग उचलला. या सुमारास व नंतर काही काळ सशस्त्र प्रतिकार व व्यक्तिगत खून हेही तंत्र काहीजणांनी अवलंबिले. प्रत्येक समाज मुक्ततेचे प्रयत्न करू लागतो तेव्हा याच उपायांचा अवलंब होतो. नंतर सामूहिक प्रतिकार वा आंदोलन यांचा मार्ग स्वीकारला जातो. आपल्या समाजाच्या आथिर्क दुरवस्थेची कारणमीमांसा नव्या नेत्यांनी केली आणि जबाबदार राज्यपद्धतीची मागणी केली. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात प्रतिनिधित्व नसेल तर कर नाहीत हे सूत्र होते. म्हणजे ते बहिष्काराचे सूत्र होते.

आपल्याकडे बहिष्काराची घोषणा बंगालच्या फाळणीच्या निषेधार्थ झाली. तिचे प्रवर्तक व पुरस्कतेर् सुरेन्दनाथ बॅनजीर् , अनेक बंगाली नेते व लोकमान्य टिळक होते. स्वदेशी , राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार अशी सूत्री होती. बंगालच्या फाळणीच्या निषेधार्थ ब्रिटिश मालावरील बहिष्कार बंगालमध्ये सुरू झाला , तेव्हा त्याची व्याप्ती देशभर असावी , ही जहालांची मागणी होती ; तर नेमस्तांना बंगालच्या बाहेर बहिष्कार नको होता. या वादावरून काँग्रेसमध्ये फूट पडली आणि जहालांना पक्षातून बाहेर जावे लागले. परंतु यामुळे काँग्रेसला मजबूत करण्यात नेमस्त यशस्वी झाले नाहीत आणि काँग्रेस दुर्बळ झाली. काँग्रेसच्या स्थापनेनंतर बावीस वर्षांनी ही मोठी फूट पडली. (स्वातंत्र्यानंतरही बावीस वर्षांनी काँग्रेसमध्ये फूट पडावी हा योगायोग विलक्षण म्हटला पाहिजे.)

पहिल्या महायुद्धानंतर रशियाला व जगाला हादरा देणारी घटना घडली व ती म्हणजे रशियात १९१७ झालेली कम्युनिस्ट क्रांती. तिला या वषीर् नव्वद वषेर् पूर्ण होतात. महायुद्धात रशियाची चांगलीच दमछाक झाली. जर्मनीने रशियाशी स्वतंत्रपणे तह करण्याची तयारी दाखवली होती. पण इंग्लंड , फ्रान्स व अमेरिका या दोस्त देशांनी अशा तहाची कल्पना त्याज्य ठरवली. काही तज्ज्ञांचे असे मत आहे की , रशियाशी जर्मनीचा वेगळा तह अगोदरच झाला असता , तरी जर्मनीचा पराभव करण्याचे दोस्त राष्ट्रांचे उद्दिष्ट सफल झाले असतेच आणि रशियात झारची सत्ता बोल्शेविकांना नष्ट करता आली नसती. ते काहीही असो ; रशियात झालेली क्रांती ही कम्युनिझम या तत्त्वावर आधारलेली होती. हे सर्वंकष तत्त्वज्ञान होते व आहे. यामुळे रशियन क्रांती ही केवळ राज्यक्रांती नव्हती. रशिया आणि सर्व जग यांची सर्वांगीण व्यवस्था पूर्णत: वेगळ्या पायावर उभी करण्याचे उद्दिष्ट या क्रांतीने समोर ठेवले होते.

मार्क्सच्या भाकिताप्रमाणे प्रगत भांडवलशाहीची जागा कामगारांच्या हुकूमशाहीने घेतली जाणार होती. तशी क्रांती इंग्लंड , अमेरिकेत व्हायला हवी होती ; कारण तिथे प्रगत भांडवलशाही होती. पण तसे न होता मागासलेल्या , शेतीप्रधान रशियात कम्युनिस्ट पक्षाने सत्ता काबीज केली. नंतरही चीन व व्हिएतनाम या शेतीप्रधान देशांतच कम्युनिस्ट सत्ताधारी झाले. रशियन क्रांतीचे हे स्वरूप लक्षात घेऊन जॉर्ज केनान या रशियाविषयक तज्ज्ञाने म्हटले की , कम्युनिझममुळे रशिया बदलला असला, तरी रशियामुळे कम्युनिझम कसा व किती बदलला याचीही दखल घेतली पाहिजे.

कामगारांच्या हुकूमशाहीची घोषणा रशियन नेत्यांनी केली असली , तरी कामगारांच्या हाती सत्ता नव्हती. लेनिनला जो व्यावसायिक क्रांतिकारकांचा वर्ग अपेक्षित होता ,त्याच्याकडे सत्ता आली. रोझा लक्झेम्बर्गने तेव्हाच इशारा दिला होता की ,कामगारांच्या हुकूमशाहीच्या नावाखाली एका पक्षाची व पक्षाच्या नावावर एका गटाची हुकूमशाही स्थापन होईल आणि मग एका व्यक्तीची. तसेच झाले आणि स्टालिनशाहीने थैमान घातले.

रशियात जीवनाच्या सर्वांगांचा विकास होणार होता ; पण त्याने सर्व लक्ष केंदित केले ते लष्करी सार्मथ्यावर. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका व रशिया या दोनच महासत्ता शिल्लक राहिल्या. केवळ लष्करी सार्मथ्यावर राज्य चालत नाही. सोव्हिएत युनियनला याचा अनुभव आला आणि क्रांतीनंतर त्र्याहत्तर वर्षांत केवळ कम्युनिस्ट पक्षाची सत्ता नष्ट झाली नाही , तर सोव्हिएत युनियन व त्याचे साम्राज्यच संपुष्टात आले. रशियातील राजवट फार काळ टिकणार नाही , असे वीस सालात लेनिनची मुलाखत घेऊन सांगणाऱ्यांत बर्ट्रांड रसेल हे अग्रभागी होते.

भारतात काँग्रेसच्या राजकारणाला १९२० सालापासून महात्मा गांधींनी वेगळे वळण लावले. त्यापूवीर् इतका मोठा भारतीय समाज आंदोलनात उतरला नव्हता. ही राष्ट्रीय आंदोलने आणि दुसऱ्या महायुद्धामुळे इंग्लंडची झालेली दुरवस्था याचा परिणाम इंग्रजांचे राज्य करण्याचे सार्मथ्य संपुष्टात येण्यात झाला व भारत स्वतंत्र झाला. त्याबरोबर देशाची फाळणी झाली. त्या कारणास्तव हिंदू-मुस्लिम तेढ कमालीची विकोपाला गेली. त्या काळात शांतता व सलोखा यांचा संदेश देणारा महात्मा जातीय राजकारणाने अंध झालेल्यांच्या विद्वेषाचा लक्ष्य झाला व त्याचा बळी घेतला गेला.

आजही हा प्रश्ान् सुटलेला नाही. त्यातच पाकिस्तानने दहशतवादी धोरणाचा अवलंब करून भारतात उत्पात घडवून आणण्याचे धोरण अवलंबिले आणि ज्या पाकिस्तानच्या दडपशाहीपासून पूर्व बंगालला भारताने मुक्त केले , तो बांगलादेश बनून भारतात दहशतवादी हल्ले करणाऱ्या गटांना आश्रय देत आहे.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर प्रजासत्ताकाची घटना तयार झाली. तिचे प्रमुख निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना हे एक साधन आहे ; तीमधील तत्त्वे अमलात आणून सामाजिक व आथिर्क विषमता तशीच चालू राहिली तर घटना निरर्थक होईल ,असा इशारा दिला होता. खुद्द बाबासाहेब ज्या अस्पृश्य गणलेल्या समाजात जन्माला आले होते , त्याची अस्पृश्यता नष्ट करण्याचे परिणामकारक धोरण अमलात येत नाही, हे पाहून जो हिंदू धर्म आम्हाला अस्पृश्य मानतो तो सोडून आम्ही बौद्ध धर्माचा स्वीकार करतो , अशी घोषणा बाबासाहेबांनी केली. याप्रमाणे आंबेडकर व त्यांच्या अनुयायांनी धर्मांतर केल्याला या वषीर् पन्नास वषेर् होतात.

बाबासाहेबांनी ज्या सामाजिक व आथिर्क विषमतेचा प्रश्ान् उपस्थित केला होता , तो महात्मा फुले यांनी एकोणिसाव्या शतकात मांडला हो

ता. हा सामाजिक व आथिर्क विषमतेचा प्रश्ान् आजही भेडसावत आहे. गेल्या काही वर्षांत अर्थव्यवहारावरील अनेक निर्बंध उठले वा सैल झाले आहेत. पण मूठभर व्यक्ती अब्जाधीश झाल्याने व लष्करी सार्मथ्य वाढल्यामुळे कोणताही देश महासत्ता होत नाही. बकाल शहरे व भकास ग्रामीण भाग ; अनेक गावांत शाळेचा अभाव आणि शाळा असली तरी शिक्षकांचा अभाव ; अशी परिस्थिती असताना महासत्तेची भाषा करणे ही एक क्रूर थट्टा ठरते.

गेल्या साठ वर्षांतील आपल्या प्रयत्नांतून आणि त्याचबरोबर गेल्या काही वर्षांत बदललेल्या आथिर्क धोरणामुळे विकासाचा मोठा टप्पा गाठला गेला आहे. पण यापुढे विकास करायचा आणि जुने व नवे प्रश्ान् सोडवायचे , तर ज्या काही पायाभूत सुविधा हव्यात त्यांत ऊर्जा ही सर्वात महत्त्वाची आहे. वीज आणि सोव्हिएत म्हणजे कम्युनिझम असे लेनिनचे समीकरण होते. ते रशियाने गाठूनही कम्युनिस्ट राजवट नष्ट झाली , ही गोष्ट वेगळी.

धरणे , कोळसा अशी साधने वीजनिमिर्तीसाठी आहेत. पण संसदीय पद्धती स्वीकारूनही ज्याप्रमाणे संसदीय वृत्ती आपल्या राजकीय पक्षांत रुजलेली नाही ,त्याचप्रमाणे आथिर्क विकासाचे ध्येय स्वीकारूनही त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा पुरवण्याचा प्रश्ान् आला की , आंदोलने , बहिष्कार आणि हिंसाचार यांचा आगडोंब उसळतो. विकासाच्या योजनांमुळे विस्थापित होणाऱ्यांना वाजवी भरपाई मिळाली पाहिजे , ही न्याय्य मागणी आहे ; पण सर्व आंदोलक केवळ हाच प्रश्ान् हाती घेत नाहीत. काही तर कारखाने हवेत की नको , असा प्रश्ान् विचारून जी अर्थव्यवस्था कोठेही यशस्वी झाली नाही , तिचा आग्रह धरतात. शेतीप्रधान समाज कंगालच राहणार. लोकसंख्यावाढीला आळा बसत नसल्यामुळे शेतीवरील लोकसंख्येचा भार अतोनात वाढला आहे. तेव्हा कारखानदारी आवश्यक आहे.

भारत आज अणुयुगात प्रवेश करत आहे. आपण क्षेपणास्त्रे यशस्वीपणे तयार करत आहोत आणि अणुबॉम्बचे स्फोटही केले. पण ऊर्जानिमिर्तीच्या साधनांची मर्यादा लक्षात घेता अणूपासून वीजनिमिर्ती करण्याशिवाय तरणोपाय नाही. ती करताना अमेरिका व इतर देशांची मदत घेणे भाग आहे. बुश सरकारने सहकाराचा प्रस्ताव मांडला आणि आपल्या अणुशास्त्रज्ञांनी तो तपासला. आपली ऊर्जा निर्माण करणारी व बॉम्ब तयार करणारी केंदे वेगळी केली असून करार केवळ ऊजेर्साठी आहे. ज्या हाइड कायद्यावरून गदारोळ उठवला आहे , तो अमेरिकन सरकारला बंधनकारक नसून केवळ सल्ला देणारा आहे , असा बुश प्रशासनाने खुलासा केला आहे. पण डाव्यांनी व भा.ज.प.ने करार हाणून पाडण्याचा चंग बांधला आहे. यात भा.ज.प. तर दुटप्पीपणाच दाखवत आहे. अणुस्फोट त्याच्या नेतृत्वाखालील सरकारने केले. ते जाहीर करताना संसदेची अनुमती घेतली नव्हती. आताच्या सरकारने असे आश्वासन दिले नाही. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे चिटणीस करात यांना अमेरिकेशी संबंधच नको असून त्या पक्षाने मनमोहन सिंग सरकारबरोबर वागताना वाटमाऱ्यांचे धोरण अवलंबिले आहे. याचवेळी चिनी अध्यक्षांनी चीन व अमेरिका यांच्यातील सहकार्याचे स्वागत करून अधिक सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली , हे विशेष. बंगालचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य इंग्रजीतील ‘ आय ‘ हे अक्षर साम्राज्यवादाची (इंपिरियालिझम) आठवण करून देत नसून गुंतवणुकीची (इन्व्हेस्टमेंट) देते असे म्हणतात व व्हिएतनामचे उदाहरण देतात. त्यांचे भाईबंद मात्र ही वस्तुस्थिती मान्य करत नाहीत.

डाव्यांच्या धोरणामुळे चीन व पाकिस्तान आनंदित झाले असतील. ज्यांनी पक्षांतर्गत वाद , राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धोरण इत्यादींबाबत जन्मभर रशिया व नंतर चीनच्या ओंजळीने पाणी प्यायचे व्रत पाळले , ते स्वातंत्र्य व सार्वभौमत्वाचे आपणच पाठीराखे असल्याचा दावा करतात हे विशेष. काहीही करून केंद सरकार व काँग्रेस पक्ष कमालीचा दुर्बल केला , तर पुढील निवडणुकीत आपल्या वाटमारीच्या धोरणाचा अधिक लाभ उठवता येईल असा कयास असावा. म्हणजे प्लासीच्या लढाईपासून दिसणारीच ही प्रवृत्ती आहे. एक पराभूत झालेला वैचारिक पंथ आणि त्याची त्याहून पराभूत झालेली व्यवस्था येथे यशस्वी होणार नाही व होऊ नये.

य.दि.फडके, सौजन्य – मटा

सामाजिक समता म्हणजे ब्राह्मणापासून अस्पृश्य समजल्या जाणा-या सर्व पुरुषांची समता असा संकुचित अर्थ जोतीरावांना अभिप्रेत नव्हता. घराबाहेर समतेचा आग्रह धरणारे पुरुष घरात समता येऊ देण्यास तयार नसतात. असे पुरुष आपल्या अनुयायांमधे दिसताच जोतीरावांनी त्यांना धारेवर धरले…. विसाव्या शतकातील महाराष्ट्राचे इतिहासकार य. दि. फडके यांनी सत्यशोधक चळवळ आणि त्यावरील महात्मा फुलेंच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव यांचा गोषवारा घेतला आहे.

……………………………………………………..

परमहंस सभा, प्रार्थना समाज किंवा आर्यसमाज या धार्मिक व सामाजिक सुधारणा घडवून आणू पाहणा-या संस्थांपेक्षा महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी स्थापन केलेला सत्यशोधक समाज वेगळा होता. सत्यशोधक समाजाचे संस्थापक जोतीराव फुले आणि अन्य सभासद हे शूद्र समजल्या जाणा-या जातीत जन्मलेले होते. त्यांनी इंग्रजी शिक्षण घेतलेले अशले तरी बहुतेकजण पदवीधर नव्हते. ख-या अर्थाने तळागाळातल्या माणसांच्या गा-हाण्यांना सत्यशोधकांनी वाचा फोडली. आणि वर्णश्रेष्ठत्वाच्या अहंकाराने सत्ता गाजवणा-या भटभिक्षुकांवर फुल्यांनी रांगड्या धसमुसळ्या पद्धतीने तिखट शब्दांत घणाघाती हल्ला चढवला. वावदूक शास्त्रीपंडितांनी तसेच कर्मठ सनातन्यांनी महात्मा फुले यांच्या लेखनातल्या व्याकरणाच्या व शुद्धलेखनाच्या चुका दाखवून बाजी मारण्याचा यशाशक्ती प्रयत्न केला, पण जोतीरावांच्या सा-या लेखनामागचा मानवी हक्कांबद्दलचा व समतेबद्दलचा नवा विचार प्रतिपक्षाला दडपून टाकता आला नाही.

सत्यशोधक समाजाची स्थापन करण्यापूर्वी जवळजवळ पंचवीस वर्षे जोतीरावांनी नानाविध स्वरूपाची लोकसेवा केली होती. मुलींना आणि अस्पृश्यांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी पुण्यात शाळा काढल्या. तसेच विधवाविवाहात विघ्ने आणणा-या कर्मठ सनातन्यांपासून उच्चवर्णीय सुधारकांचे रक्षण केले, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापन केली आणि एका अनाथ मुलाला स्वतःचा मुलगा मानून त्याला लहानाचा मोठा केला. आपल्या घरचा हौद अस्पृश्य समजल्या जाणा-यांना खुला केला. ‘ सत्यदीपिका ’नियतकालिक चालविणारे बाबा पदमनजी यांच्यासारख्या ख्रिस्ती मिशनरी आणि ज्ञानोदयासारख्या मिशन-यांच्या मुखपत्राने जोतीरावांना नेहमी साहाय्य केले आणि त्यांची कड घेतली. त्यामुळे जोतीराव फुले हे ख्रिस्ती मिशन-यांचे हस्तक, अशी गोपाळराव आगरकरांसारख्या सुधारकाग्रणीचीही समजूत होती. जोतीरावांच्या विचारावर टॉमस पेन यांच्या धर्म व समाजविषयक विचारसरणीचा फार प्रभाव होता.

जोतीरावांनी वैदिक किंवा आर्यांच्या परंपरेवर झोड उठवली. अनार्यांच्या वैदिक परंपरेपासून प्रेरणा घेतली. त्यांनी केवळ जन्माधिष्ठित जातिव्यवस्थाच नाकारली असे नव्हे तर सबंध चातुर्वर्ण्य व्यवस्थाच अन्याय्य व विषम असल्याने त्याज्य ठरवली. जोतीरावांचे एक समकालीन लोकहितवादी यांनीही पुराणातील भकडकथांची चेष्टा केली, पण वेदांविषयी त्यांना आदर होता. याउलट श्रृतिस्मृति, शास्त्रे, पुराणे वगैरे आर्य भटांनी रचलेले भारेच्या भारे ग्रंथ म्हणजे ब्रह्मकपट आहे, असे जोतीराव म्हणत. ‘त्रयो वेदस्य कर्तारो भंड धूर्तः निशाचराः ’ हे बृहस्पतींचे वचन अनेकदा उद्धृत करीत. सिद्धाचार्य अश्वघोष या लेखकाने रचलेल्या वज्रसूची या ग्रंथाच्या संस्कृत बृहत्पाठाचा अनुवाद तुकोबांच्या शिष्या बहिणाबाई, शाहूकालीन कवी श्यामराज तसेच नाथलीलामृताचे कर्ते आदिनाथ गुरव यांनी केला होता. वज्रसूचीने जातिव्यवस्थेचे खंडन केले होते. त्यामुळे मध्ययुगीन मराठी संतकवींप्रमाणेच जोतीरावांनाही हा ग्रंथ प्रेरक वाटला. वज्रसूचीच्या आधारे तुकाराम तात्या पडवळ यांनी ‘ एक हिंदू ’ या टोपण नावाने ‘ जातीभेदविवेकसार ‘ ग्रंथ प्रसिद्ध केला होता. त्याची दुसरी आवृत्ती जोतीरावांनी १८६५ साली स्वखर्चाने प्रकाशित केली होती. कबीराच्या बीजक ग्रंथातील ‘ बिप्रमती ’ हा भाग जोतीरावांना आवडत असे. कबीराचा हा ग्रंथ त्यांनी कबीरपंथी ज्ञानगिरीबाबा यांच्याकडून समजावून घेतला होता. ख्रिस्ती धर्मोपदेशकांप्रमाणेच हे ग्रंथही जोतीरावांच्या प्रेरणेचे स्रोत होते. सत्यशोधक समाजात सभासदाला प्रवेश देताना तळी उचलावी लागत असे. तळीचे सामान म्हणून एका पिशवीत भंडारा, गुलाल, गुळाचा खडा, खोब-याच्या वाट्या, धने, विड्याची पाने, सुपारी वगैरे जिनसा ठेवलेल्या असत. तळी उचलताना खंडोबा, बहिरोबा वगैरे वीरांच्या नावे चांगभले किंवा येळकोट असा पुकारा केला जात असे. सत्यशोधक समाजाच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे ख्रिस्ती धर्मोपदेशकांशी घनिष्ठ संबंध असले तरी त्यापैकी कोणी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याचे आढळत नाही.

सत्यशोधक समाजाच्या आरंभीच्या पंचवीस-तीस वर्षांत तेलगू फुलमाळी आणि महाराष्ट्रातील माळी जातीतील सभासदांची संख्या थोडी जास्त असली तरी त्यात मराठा, कुणबी, प्रभू, गवळी, शिंपी, कुंभार, साळी, भंडारी, लिंगायत वाणी, वंजारी वगैरे जातींचेही सभासद होते. कंत्राटदारांखेरीज व्यापारी, सरकारी नोकर, डॉक्टर, वकील, ओव्हरसियर वगैरे व्यावसायिकांचाही समाजाच्या सभासदांमधे आणि मित्रांमधे समावेश होता. १९ व्या शतकातील मुंबईच्या जडणघडणीत पाठारे प्रभू, पाचकळशी किंवा सोमवंशीय क्षत्रिय, सोनार, कपोल भाटिया या जातींप्रमाणेच तेलंगणातून आलेल्या आणि मुंबईत बांधकामाच्या व्यवसायात मजूर, मुकादम, ठेकेदार, कंत्राटदार म्हणून काम करीत नावारुपाला आलेल्या कोमटी, वंजारी तसेच तेलुगू मुनुरवार किंवा तोटा बलीजा (तेलुगू फुलमाळी) या जातीतील लोकांचा मोठा वाटा आहे. मुंबईतील कामाठीपु-यात स्थायिक झालेले हे लोक मराठी भाषा शिकले आणि येथील सांस्कृतिक जीवनाशी एकरू झाले. मुंबईत आजही लक्ष वेधून घेणा-या आणि गेल्या शतकात बांधल्या गेलेल्या कित्येक जुन्या आलीशान इमारतींचे बांधकाम व्यंकू बाळाजी कालेवार, स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावारू, देवजी यल्लाप्पा, जाया नागू परभाजी, जाया काराडी लिंगू, जयसिंगराव सायबू वडनाला, राजू बाबाजी, नागू सयाजी वगैरे नामवंत कंत्राटदारांनी केले. हे सारे सत्यशोधक समाजाचे सभासद अगर मित्र होते. व्यवसायात कमावलेल्या पैशाचा उपयोग त्यांपैकी काहींनी शाळा काढण्यासाठी, वाचनालये सुरू करण्यासाठी केला. सत्यशोधक समाजाला वृत्तपत्र व पुस्तके प्रकाशित करता यावीत म्हणून व्यंकू बाळोजी कालेवार आणि रामय्या व्यंकय्या अय्यावारू यांनी छापखानाही दिला होता. या तेलगू भाषिकांप्रमाणेच फुले, कृष्णाजी पांडुरंग भालेकर (१८५०- १९१०), रामचंद्र हरी शिंदे वगैरे मराठी भाषक माळीही रस्त्यांची, कालव्यांच्या बांधकामाची कंत्राटे घेत असत. इंग्रजी राजवटीमुळे माळ्याचा पारंपरिक व्यवसाय सोडून अधिक पैसा मिळवून देणारा कंत्राटदाराचा व्यवसाय करणे त्यांना शक्य झाले. विद्येची बंद कवाडेही त्यांना इंग्रजी राजवटीतच प्रथम खुली झाली. ज्या परकी राजवटीमुळे त्यांना विकासाची संधी प्रथमच मिळाली त्या राजवटीशी ही मंडळी एकनिष्ठ राहाणे स्वाभाविक होते. परक्या राजवटीच्या तुलनेने आधीची स्वकीयांची राजवट त्यांना उपरी व नकोशी वाटली हेही समजण्यासारखे आहे.

सत्यशोधक समाजाची चळवळ ही मूलतः धार्मिक व सामाजिक सुधारणांचा आग्रह धरणारी चळवळ होती. सत्यशोधक समाजाच्या नियमांनुसार सभासदांना राजकीय विषयाची चर्चाही करता येत नसे. १८७७ साली समाजाने महारमांगांची दुःखे व दुष्काळ या विषयावर निबंध व वक्तृत्वस्पर्धा घेतल्या तेव्हा चिटणीस या नात्याने जोतीरावांनी स्पर्धकांना जाहीर इशारा दिला होता, ‘ या विषयावर ( म्हणजे राजकारणावर) कोणी उमेदवार लिहील किंवा बोलेल तर त्याचे भाषण लागलेच बंद केले जाईल ’ . सत्यशोधक समाजालाही इंग्रजी राज्य म्हणजे प्रभूची कृपा वाटत असे, कारण त्यामुले शूद्र आणि अतिशूद्र प्रजा भटशाहीच्या जुलमातून एकदाची सुटली असे फुल्यांचे म्हणणे होते. इंग्रज बहादूराच्या राज्याच्या प्रतापाने भटशाहीत गांजलेल्या सर्व जातीच्या स्त्रियांना तुरळक तुरळक का होईना लिहिता वाचता येऊ लागले याचे फुल्यांना समाधान वाटत होते. न्यायी, उदार, निष्पक्षपाती इंग्रज राजवटीवरील सत्यशोधकांच्या निष्ठेमुले आणि राजकारणापासून अलिप्त राहण्याबद्दल त्यांचा कटाक्ष असल्यामुळे इंग्रजांच्या पलटणीतील सैनिकांना उद्देशून मतप्रचार करण्याची सत्यशोधकांना मुभा दिली जात असे. एवढेच नव्हे तर लष्करातील व पोलिसातील कर्मचारी सत्यशोधक समाजाचे सभासद होऊन कार्य करू लागल्यास इंग्रज सरकारने त्यांना कधी आडकाठी आणली नाही.

शूद्रादी अतिशूद्रांची, सर्व जातीच्या स्त्रियांची, शेतक-यांची दुर्दशा दूर व्हावयाची असेल तर या सर्वांना विद्या मिळविण्याची संधी मिळाली पाहिजे यावर सत्यशोधकांचा भर होता. ‘ विद्येविना मती गेली। मतीविना नीति गेली। नीतीविना गति गेली। गतीविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।। ‘ असे फुले म्हणत. इंग्रज राज्यकर्त्यांनी विद्यापीठीय स्तरावरील उच्चशिक्षणास अग्रक्रम दिला तर उच्चविद्याविभूषित उच्चवर्णीय आपणास मिळालेले ज्ञान इतरांना देतील आणि अशा त-हेने ज्ञान हळूहळू समाजातील खालच्या थरापर्यंत झिरपत जाईल, असा एक सिद्धांत त्या काळात मांडला जात असे. तो किती पोकळ आहे हे फुल्यांना तीव्रतेने जाणवत होते. संपत्ती व सत्ता यांच्याप्रमाणेच ज्ञानही आपोआप किंवा सहजासहजी खालपर्यंत झिरपत जात नाही. जोतीरावांना याची कल्पना असल्याने त्यांनी ‘ आधी कळस मग पाया रे ’ या विपरित पद्धतीच्या इंग्रजांच्या शैक्षणिक धोरणाबद्दल नापसंती दर्शवून प्राथमिक शिक्षणाला अग्रक्रम द्यावा, अशी मागणी केली.

भटभिक्षुकांच्या लबाड्या, मद्यपानाचे दुष्परिणाम, विद्यार्जनाचे महत्त्व वगैरे विचार निरक्षर लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अभंग, ओवी, पोवाडा, आरती, मंगलाष्टक, कटाव, लावणी, नाटक, कीर्तन वगैरे बुहसंख्य लोकांना ओळखीच्या असलेल्या वाड्मयप्रकारांचा सत्यशोधकांनी परिणामकारक वापर केला. इंग्रजी साहित्याच्या प्रभावामुळे तेव्हा निबंध हा वाड्मयप्रकार मराठीत रुजू लागला होता. ‘ शेतक-यांचा आसूड ’ हा एक विस्तृत निबंध वगळता अशा प्रकारचे लेखन जोतीरावांनी केले नाही. कारण ते ज्यांच्यासाठी लिहित होते त्यांना विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेतील लफ्फेदार, ऐटबाज व संस्कृतप्रचुर निबंधांपेक्षा मराठमोळे काव्य व संवाद अधिक प्रिय होतील हे त्यांना माहीत होते. खेड्यातील शेतक-यांना फसवणारा व निरक्षऱ पाटलाला मुठीत ठेवणारा कलमबहाद्दर ब्राह्मण कुलकर्णी हे एक सत्यशोधकांच्या मा-याचे महत्त्वाचे लक्ष्य होते. ‘ गावगुंड अडमुठा, लुटीतो कुळकर्णी पठ्ठा ’ या कृष्णाजी पांडुरंग भालेकरांनी लिहिलेल्या लावणीच्या धृपदात किंवा त्यांनीच १८७७ साली लिहिलेल्या बळीबा पाटील नावाच्या ग्रामीण कादंबरीत कुळकर्ण्याविषयीचा शेतक-यांना वाटणारा संताप उफाळून बाहेर येताना दिसतो. सर्व प्रकारच्या अडचणींना तोंड देऊन, पदरमोड करून भालेकरांनी पुण्यात १८७७ साली ‘दीनबंधू ’ पत्र सुरू केले तेव्हा त्यांना अवघे १३ वर्गणीदार मिळाले. १८८० च्या मे महिन्यात नारायण मेघाजी लोखंडे यांनी हे पत्र चालवावयास घेऊ मुंबईहून प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली तेव्हाही फक्त ३२० वर्गणीदार होते. पुरेशा वर्गणीदारांच्या अभावी वृत्तपत्र चालविण्याच्या जिद्दीपायी भालेकरांना घर, जमीन, दागदागिने विकावे लागले. मुंबईसही लोखंडे यांनी भक्कम आर्थिक पाठबळ दिले होते. त्या काळातली बहुतेक वृत्तपत्रे ब्राह्मणांसारख्या उच्चवर्णीयांच्या मालकीची असताना सत्यशोधकांनी व त्यांच्या पाठीराख्यांनी दीनमित्रासारखे मासिक ‘ बडोदावत्सल ’ , ‘ राघव भूषण ’ , ‘अंबालहरी ’ व ‘ शेतक-यांचा कैवारी ’ ही वृत्तपत्रे चालवली होती.

जोतीराव फुले हे सत्यशोधक समाजाचे संस्थापक असले तरी ते म्हणतील ती पूर्व दिशा असा प्रकार सत्यशोधक चळवळीत आरंभीच्या काळातही नव्हता. वैयक्तिक मतभेदामुळे, स्वभावभिन्नतेमुळे, हेव्यादाव्यांमुळे, नेतृत्वासाठी चालणा-या स्पर्धेमुळे तसेच वैचारिक मतभेदांमुळे सत्यशोधक चळवळीत वेळोवेळी ताणतणाव निर्माण होत असत. स्त्री पुरुष समतेबद्दलची फुल्यांची मते लोखंडे व भालेकर यांना मान्य नव्हती. ‘स्त्री पुरुष तुलना ’ नावाचे पुस्तक बुलढाण्याच्या ताराबाई शिंदे यांनी लिहिले तेव्हा लोखंडे व विशेषतः भालेकर यांनी या पुस्तकावर कडाडून टीका केली. त्यावेळी ताराबाई शिंदे आणि पंडिता रमाबाई या स्त्रियांची कड घेऊ जोतीरावांनी खरमरीत शब्दांत आपल्या अनुयायांची हजेरी घेतली आणि त्यांचे कान उपटले. सामाजिक समता म्हणजे ब्राह्मणापासून अस्पृश्य समजल्या जाणा-या सर्व पुरुषांची समता असा संकुचित अर्थ त्यांना अभिप्रेत नव्हता. घराबाहेर समतेचा आग्रह धरणारे पुरुष घरात समता येऊ देण्यास तयार नसतात. असे पुरुष आपल्या अनुयायांमधे दिसताच जोतीरावांनी ‘इशारा ’ , ‘ सत्सार ’ अंक १ व २ वगैरैंमधून त्यांना धारेवर धरले. रमा, तारेस शिकवायला जाणा-यांनी न्यायमूर्ती रानडे यांच्याप्रमाणे लग्नाच्या भार्येस घरातले घरात आधी विद्वान करावे, असे जोतीरावांनी त्यांना खडसावले. रानड्यांच्या आधी कितीतरी वर्षे जोतीरावांनी आपल्या पत्नीस सावित्रीबाईस शिकवून त्यांना शिक्षिका म्हणून आपल्या कामात सहभागी करून घेतले होते.

१८९० साली जोतीराव कालवश झाले. १८९६-९७ ते १९०२ पर्यंतच्या काळात दुष्काळ व प्लेग यांनी थैमान घातले असताना अनेक सत्यशोधक मृत्युमुखी पडले. सावित्रीबाई फुले व नारायणराव लोखंडे यांचे प्लेगने बळी घेतले. व्यंकू बाळोजी कालेवार, जाया काराडी लिंगू, विश्राम रामजी घोले इत्यादि प्रमुख सत्यशोधख १९०२ पूर्वी कालवश झाले. मुंबई आणि पुणे शहरांतील सत्यशोधक समाजाचे काम थंडावल्यासारखे वाटले तरीही ती चळवळ ग्रामीण भागात मूळ धरू लागली. १८९९ सालापासून नारायण बाबाजी पानसरे उर्फ नारो बाबाजी महाधट आणि धर्माजी रामजी डुंबरे पाटील या जुन्नर तालुक्यातील ओतूरच्या दोघा समाजसेवकांनी चळवळीचे लोण खानदेशात, व-हाड मध्यप्रांतात नेण्यास सुरुवात केली.

(विसाव्या शतकातील महाराष्ट्र या पुस्तकातून साभार)

सुहास पळशीकर, सौजन्य – लोकसत्ता

स्थलांतराचा मुद्दा भावनिक बनवता येतो.  पण महाराष्ट्रातील शहरे आणि त्यांचा विकास हा चिकाटीने राजकारण करण्याचा विषय असतो. नोकरीच्या प्रश्नाखेरीज मराठीच्या गळचेपीविषयीही मुद्दे येतात. त्यांचाही गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठीचा मुद्दा उचलल्यापासून दोन वर्षांत लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुका झाल्या; त्या निमित्ताने मनसे आणि राज ठाकरे यांना माध्यमांनी खूप जागा उपलब्ध करून दिली. विविध आंदोलनांद्वारे प्रसिद्धीच्या झोतात राहिलेल्या या पक्षाने महाराष्ट्राच्या अस्मितेबद्दल आणि मराठी भाषेबद्दल अनेक मुद्दे पुढे आणले. दैनंदिन व्यवहारात मराठी वापरण्याचा आग्रह, दुकानांच्या/ कार्यालयांच्या पाटय़ा मराठीत लावण्याचा आग्रह, स्थलांतरितांवर राज्यात मर्यादा घालण्याची मागणी, महाराष्ट्रात नोकरी-व्यवसायांमध्ये मराठी माणसांना प्राधान्य हे मुद्दे पुन्हा एकदा पुढे आले. शिवाय मुंबईचा मुद्दाही अर्थातच होता.

या खळबळीला आणि मनसेच्या मागणीनाटय़ाला अत्यंत तुटपुंजा प्रतिसाद या संपूर्ण काळात दिला गेला. दुसरीकडे विविध राजकीय पक्षांची मनसेमुळे तारांबळ उडाल्याचे दिसते. शिवसेना सर्वात जास्त गोंधळात पडली. सुरुवातीला शिवसेनेने अशी भूमिका घेतली की, हे सर्व आमचेच (जुने) मुद्दे आहेत. पण जेव्हा मनसेच्या लोकप्रियतेचा आलेख वाढल्यासारखे वाटायला लागले, तेव्हा शिवसेनेने जास्त आक्रमकपणाचा आव आणीत मराठीचा गजर सुरू करून राहुल गांधींना अंगावर घेण्याचे धाडस केले. पण कल्पनाशून्यतेची खरी चमक दाखवली ती काँग्रेसने आणि राज्य सरकारने!

गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्र सरकारने मनसेचा अनुनय करणारी किती धोरणे/निर्णय वगैरेंची घोषणा केली हे पाहण्यासारखे आहे. एकेकाळी राज ठाकरे यांच्या काकांची सेना ‘वसंतसेना’ म्हणून ओळखली जायची. त्यामागे वसंतराव नाईकांचे चातुर्य होते. आता मनसेला खतपाणी घालणाऱ्या राज्य सरकारकडे ते चातुर्य नाही. त्यामुळे मनसेला ‘अशोकसेना’ म्हणता येणार नाही. मात्र काँग्रेसमधील काही मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना मनसेच्या प्रभावाने अगदी झपाटून टाकलेले दिसते. त्यामुळे एकीकडे ‘कायदा हातात घेऊ न देण्याच्या’ गर्जना आणि दुसरीकडे मनसेला आयत्या संधी मिळवून देणाऱ्या घोषणा, असा दुतोंडीपणा राज्य सरकार करताना दिसते.

आता निवडणुका होऊन गेल्या आहेत. राज्य सरकारला पुन्हा संधी मिळाल्यामुळे त्याच्यावर जबाबदारी येऊन पडली आहे. पीछेहाटीनंतर शिवसेनेला पुनर्विचारासाठी वेळ मिळाला आहे आणि राज्याच्या राजकारणात चंचुप्रवेश केल्यामुळे मनसेलादेखील कर्कश मराठीवादाची तूर्त गरज नाही.

नोकरी-व्यवसायातील संधी हा राज ठाकरे यांच्या बोलण्यातला सर्वात आकर्षक  मुद्दा आहे. जागतिकीकरणानंतर श्रमिकांच्या आणि पांढरपेशांच्याही जीवनात उपजीविकेच्या साधनांच्या अनौपचारिकीकरणाचा अनुभव मध्यवर्ती बनू लागला आहे. अर्धकुशल, अकुशल आणि भासमान कुशल (म्हणजे निरुपयोगी पदव्या मिळालेले तरुण) अशा त्रिविध गटांना नोकरी-व्यवसायाची अस्थिरता भेडसावते आहे. म्हणूनच या टप्प्यावर मनसेचा ‘मराठी तरुणांना संधी द्या’ हा मुद्दा आकर्षक ठरला. या अर्थाने मनसेचे ‘स्थानिकतावादी राजकारण’ हे जागतिकीकरणाचे एक अपत्य आहे हे लक्षात घ्यायला हवे. (मनसेची चुलत संस्था शिवसेना हीसुद्धा १९६० च्या दशकातल्या भांडवलशाही विकासातून उभी राहिलेली प्रतिक्रियाच होती.) ‘कॉस्मॉपॉलिटन’ प्रतिसाद बेगडी ठरतो तो या कारणामुळे.  मनसेच्या  मागणीतील पहिली गफलत म्हणजे, ते मराठी व बिहारी (उत्तर भारतीय) तरुणांमध्ये एका भ्रामक द्वंद्वाची/स्पर्धेची मांडणी करीत आहेत. हे दोन समूह भिन्न क्षेत्रांत संधी शोधत आहेत. त्यामुळे त्यांच्यात प्रत्यक्ष किंवा खरी स्पर्धा फार मर्यादित आहे. बिहार-उत्तर प्रदेशातून विविध प्रकारचे श्रमिक देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये स्थलांतरित होतात. त्यांच्या पारंपरिक कौशल्यानुसार ते अन्यत्र कामधंदा शोधतात.  याउलट, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील तरुण शहरांमध्ये स्थलांतर करतात तेव्हा आपल्या पारंपरिक जातीनिष्ठ व्यवसायातून बाहेर पडण्याच्या-भांडवलशाही अर्थकारणात प्रवेश करण्याच्या- अपेक्षेने ते शहरांकडे वळतात. त्यामुळे मनसे ज्या स्पर्धेची कल्पना करते ती काही क्षेत्रांपुरतीच (कारकुनांची भरती, शिपायांची भरती) मर्यादित असते.

दुसरी गफलत म्हणजे, मुंबई आणि ठाणे-पुणे-नाशिक या शहरांच्या विकासातून आणि आजूबाजूच्या शहरांच्या भकासपणातून जे प्रश्न निर्माण होतात त्यांच्याविषयी मनसे बोलत नाही. स्थलांतराचा मुद्दा भावनिक बनवता येतो.  पण महाराष्ट्रातील शहरे आणि त्यांचा विकास हा चिकाटीने राजकारण करण्याचा विषय असतो. त्याबद्दल बोलले तर ती भाषणे कोणते चॅनेल ‘लाइव्ह’ दाखवेल?

शहरांच्या विकासाच्या प्रक्रियेला खीळ घालण्यात बिल्डर्स, डेव्हलपर्स, एजंट्स अग्रेसर असतात. मनसेच काय, इतरही पक्ष याच हितसंबंधांच्या मदतीने तरी चालतात किंवा त्यांचे अनेक कार्यकर्ते- नगरसेवक यांचे हितसंबंध या व्यवसायांमध्ये गुंतलेले असतात. छोटय़ा शहरांवर स्थानिक व्यावसायिकांचा विळखा जास्तच जबर असतो. त्यामुळे तेथेही धडपणे विकास होऊ शकत नाही. ‘बाहेरून येणाऱ्यांमुळे तणाव निर्माण होतात’ असा युक्तिवाद भावनिक पातळीवर नेऊन मांडला जातो.

तिसरी गफलत म्हणजे, ‘स्थलांतर’ नावाच्या सामाजिक वस्तुस्थितीचे अशास्त्रीय आणि अनैतिहासिक आकलन. प्रत्येक शहरातील ‘स्थलांतरिता’ची आकडेवारी देऊन अर्थातच प्रभाव पडतो. पण शहर नावाची गोष्ट आधुनिक काळात घडते तीच मुळी स्थलांतराच्या जीवनसत्त्वातून. जेथे जाण्यासारखे काही नाही तेथे लोक कशाला जातील? जेथे संधीची क्षितीजे विस्तारतात तेथेच भविष्याची स्वप्ने खांद्यावर घेऊन लोक जातात. त्यातून ती शहरे आणखी समृद्ध होतात.  ‘शहरीकरण’ आणि स्थलांतर यांचे नाते निकटचे असते हे मान्य करावेच लागेल. स्थलांतराची प्रक्रिया घडत नसती तर पुणे अजूनही ‘पेन्शनरांचे शहर’ राहिले असते आणि नाशिकची ओळख फक्त ‘तीर्थक्षेत्र’ एवढीच राहिली असती. पण खरे तर मुद्दा असा आहे की, आधुनिक भांडवलशाहीतच नव्हे तर त्यापूर्वीच्या कोणत्याही आर्थिक विकासात स्थलांतर ही गोष्ट अविभाज्य राहिली आहे. त्यामुळे स्थलांतर थांबवता येईल किंवा त्या प्रक्रियेचे चक्र उलटे फिरवता येईल (परत पाठवणी), हे पर्याय सामाजिक गतिशास्त्रात आणि इतिहासात फारच क्वचित  उपलब्ध असतात.

स्थानिक कोण? यावर मनसे म्हणेल की, स्थलांतरितांच्या तुलनेत स्थानिकांना संधींमध्ये प्राधान्य द्यावे.  पण ‘स्थानिक कोण’ हा खरे तर जिकिरीचा मुद्दा आहे. मनसेच्या दृष्टीने ‘अस्सल मराठी’ व्यक्ती ही स्थानिक असते. म्हणजे ज्यांचे आई-वडील दोघेही मराठी भाषक ते स्थानिक मानायचे का? आणि पुन्हा मराठी भाषक म्हणजे काय? त्यांनी (आई-वडिलांनी) मराठी येत असल्याचे प्रशस्तिपत्र आणायचे की नुसते ‘मराठी’ आडनाव असले की पुरेल?  मनसेच्या भावनिक महापुरात कोणाच्या लक्षात न येणारा हा मुद्दा आहे. सांगली-कोल्हापूरकडच्या जैन किंवा शहा आडनावांच्या घरात कित्येकदा फक्त मराठीच बोलले जात असते, अनेक देशपांडे-पाटील कुटुंब कन्नड बोलणारी असतात, बंदेवार-भागवतवार यांना मराठी येत असते.. हे  विचारात न घेता ‘खऱ्याखुऱ्या’ मराठीची मागणी करणे सोपे, पण व्यवहार अवघड असतो. सरकारी खाक्या वेगळा. तेथे ‘डोमिसाइल’वर सगळे ठरते. म्हणजे किती वर्षे ‘येथे’ राहतोय याचा पुरावा. सरकार सांगणार की, पोटासाठी मुंबईत आलात का? पंधरा वर्षे थांबा, मग प्रेमाने तुम्हाला नोकरी/ प्रवेश/ परवाना देऊ. एवढा आचरटपणा फक्त सरकारी धोरणातच असू शकतो आणि असा डोमिसाइलचा आग्रह नोकऱ्यांपुरता नाही, तर पथारी व्यवसाय करण्यासाठी किंवा टॅक्सी व्यवसाय करण्यासाठीही धरला जाणार म्हणजे आमदाराला मंत्रिपदासाठी पाच वर्षे दम निघत नाही, पण पोट भरण्यासाठीआलेल्याला १५ वर्षे थाांबायला सांगायचे!
या सर्व प्रकरणात स्थानिक म्हणजे महाराष्ट्राचा रहिवासी असे गृहीत धरले आहे. पण मुळात स्थानिकपणाच्या आग्रहात त्याच्या अतिरेकाची बीजे आहेत. आज महाराष्ट्रात अनेक विद्यापीठे प्रवेश देताना सत्तर टक्के जागा ‘स्थानिकां’साठी म्हणजे त्या विद्यापीठक्षेत्रासाठी राखून ठेवतात. म्हणजे पुणे विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी महाराष्ट्राचा सात जन्मांचा रहिवासी असणे पुरेसे नाही, तर पुणे-नगर-नाशिक या  जिल्ह्य़ांत रहिवास किंवा पूर्व शिक्षण व्हावे लागते. हे जर नोकऱ्यांबाबत सुरू झाले तर ते  योग्य आहे का, याचा विचार स्थानिकत्वाचा निकष मांडणाऱ्यांनी करायला हवा.

मनसेच्या मागण्यांमध्ये नोकरीच्या प्रश्नाखेरीज मराठीच्या गळचेपीविषयीही मुद्दे येतात. त्यांचाही गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. उदाहरणार्थ, दुकानांच्या पाटय़ा मराठीतून असण्याचा आग्रह चांगला वाटतो. सरकारही अधूनमधून त्याचा पाठपुरावा करते; पण आपण नेमका कशाचा आग्रह धरतोय? मराठीचा की देवनागरीचा? ‘इंडिया बुल्स’ किंवा ‘बॉम्बे डाइंग’ हे देवनागरीत लिहिणे आपल्याला अपेक्षित आहे की, ‘ए-वन हेअर स्टायलिस्ट’चे  ‘अव्वल  केशकर्तनालय’ (वगैरे) मराठीकरण हवे आहे? की मराठी सीरियल्समधली पात्रे मराठी बोलून हवी आहेत? की टेलिव्हिजनवर सोपे आणि सुडौल मराठी हवे आहे?

‘मराठी माणसांनी मराठी बोलावे’ हा आग्रह धरताना जणू काही असे गृहीत धरले जाते की परप्रांतीयच आपल्याला मराठी बोलू देत नाहीत. पण सकाळी उठल्यावर आई-वडिलांना गुडमॉर्निग म्हणणारी बाळे बाहेरच्यांशी काय मराठी बोलणार?

शुद्ध तुपातल्या सात्त्विक मराठीचा आग्रह धरून मराठी/ महाराष्ट्रीय संस्कृती टिकेल/ वाढेल असे आपण का मानतो? सरमिसळीने संस्कृती जास्त स्वागतशील आणि म्हणूनच जास्त स्वीकारार्ह बनते. मराठीच्या संगतीने मुंबईतील हिंदी हे उत्तरेतील हिंदीपेक्षा किती वेगळे झाले आहे हे आपल्याला माहितीच आहे. आता जर हिंदी शब्दप्रयोगांचा कोश कोणी काढला, तर ‘वाट लगा दी’ हा प्रयोग त्यात समाविष्ट करावा लागेल आणि ती मुंबईने घातलेली भर असेल. बाहेरून महाराष्ट्रात येणारी माणसे पहिल्यांदा शोधतात तो वडापाव. कारण ते आजच्या महाराष्ट्राचे जणू खाद्यवैशिष्टय़ बनले आहे. त्यामुळे मी पाणीपुरी खाणारच नाही (किमान भैय्याकडची खाणार नाही) असे म्हणून कसे चालेल? भाषा हा संस्कृतीचा घटक  असतो हे खरे, पण त्याच भाषेबद्दल कट्टरपणा हा संस्कृती- संकोचाला कारणीभूत होऊ शकतो. त्या भाषेइतकेच आपला भूगोल, आपली ऐतिहासिक जाणीव आणि समाजभान यांच्या आधाराची संस्कृतीला गरज असते. भाषिक व्यवहारापुरती संस्कृती ही संकल्पना बंदिस्त केली तर आपल्या भाषा-जात-धर्म-प्रांत यांच्या पलीकडच्या व्यापक सांस्कृतिकतेशी फारकत घडून येते.

अशी फारकत झाली की, ‘मालकी’ची भाषा सुरू होते. महाराष्ट्र कोणाचा, मुंबई कोणाची, असे प्रश्न सार्वजनिक चर्चेत येणे हे या सांस्कृतिक उणिवेचे लक्षण आहे. भावनिक आवाहनाने प्रभावित झालेले अनुयायी तशी कृती करायला उद्युक्त होतात आणि मग नेत्यांनाही ‘मी या कृतीबद्दल अमुकचे अभिनंदन करतो’ असे म्हणून ती कृती उचलून धरावी लागते. म्हणजे मग भाषेचा मुद्दा राहतो बाजूला आणि दमदाटी, रस्त्यावरचे राजकारण आणि ते करणारे कार्यकर्ते यांचाच वरचष्मा दिसू लागतो.

अशा विविध पेचांचा आणि धोक्यांचा विचार मनसेच्या राजकारणाच्या निमित्ताने होण्याची गरज आहे. विचारांची खोली आणि  विविधता यांची कोणत्याही समाजाच्या जडणघडणीला आवश्यकता असते. म्हणून हा लेखनप्रपंच!