Posts Tagged ‘देव’

डॉ. यशवंत रायकर, सौजन्य – मटा

 

देव विरुद्ध दैत्य संघर्ष भारतीय परंपरेतील एक मध्यवतीर् विषय आहे. पण तो केवळ हिंदू धर्मशास्त्राचा भाग नसून मिथकाच्या भाषेत व्यक्त झालेला, मानवी इतिहासातील सत्तासंघर्षाचा मूलभूत प्रश्न आहे. पशूपालन अवस्थेतील आर्यांना अग्नी प्रज्वलित ठेवणे अगत्याचे होते. त्यासाठी यज्ञसंस्था आली. पृथ्वी, आकाश व अंतरिक्ष येथील दृश्य व अदृश्य तत्त्वांना देवता मानून त्यांची आराधना केली जाई. स्त्री, संतती, गोधन, दीर्घायुष्य लाभावे, शत्रूचा नाश व्हावा यासाठी यज्ञ होत. देवांचा राजा इंद. त्याला वश करून घेणे हा हेतू. यज्ञ संस्थेला अफाट महत्त्व असलेल्या अशा काळात सुरासुर संग्रामाची कथा जन्मास आली. इंद व त्याला भारी पडणारा त्याचा शत्रू वृत्र यांच्यातील युद्धाच्या काव्यमय वर्णनातून या कथेची सुरुवात होते. पुढे तिला वेळोवेळी सोयीस्कर वळणे दिली आहेत. असुरांच्या पराभवासाठी यज्ञ केले जात असल्यामुळे कथेला एक वेगळा अर्थ प्राप्त होतो. वैदिक देवतांना मानणारे व न मानणारे यांतील तो संघर्ष बनतो. तत्कालीन इराणी आर्यसुद्धा अग्निपूजक होते पण ते वैदिक देवतांना मानीत नसत. त्यांच्यात अहुर (असुर) हे चांगले व देव वाईट आहेत. अहुरमज्दा अहुरांचा त्राता व देवांचा काळ. म्हणून वैदिक संस्कृतीत हे शब्द उलट्या अर्थाने रुढ झाले. पण हा वृत्र कोण? एक अर्थ असा की, वृत्रामुळे पृथ्वीवर प्रकाश नव्हता, पाऊस पडत नव्हता, नद्या वाहत नव्हत्या. वृत्राला मारून इंदाने त्यांच्या वाटा मोकळ्या करून दिल्या. म्हणजे ही सृष्टीच्या आरंभाची कथा होय. इति- लो. टिळक. डोंगरांना पंख असल्यामुळे ते एका जागेवर राहत नव्हते; इंदाने त्यांचे पंख तोडले या मिथ्यकथेत उपखंड उत्तरेकडे सरकत असल्यामुळे हिमालयाची उंची वाढत होती, या भूवैज्ञानिक तथ्याची पुसट जाण व्यक्त होते.

वृत्राची वंशावळ मोठी मनोरंजक आहे. दक्ष प्रजापतीच्या तेरा कन्यांचा विवाह कश्यपाशी झाला. या तेरापैकी अदितीचे पुत्र ते आदित्य. त्वष्ट्रा (म्हणजे विश्वकर्मा) त्यापैकी एक. त्याचा पुत्र वृत्र. अर्थात तो ब्राह्माण. त्याच्या वधामुळे इंदाला ब्रह्माहत्येचे पाप लागते. पापक्षालनासाठी त्याला यज्ञ करावे लागतात. याखेरीज कश्यपाला दितीपासून झालेले पुत्र दैत्य, दनूपासून झालेले दानव व अनायूपासून झालेले असुर असेही म्हटले आहे. याचा अर्थ सुरासुर संघर्ष सावत्र भावांमधील वैर ठरतो. सत्तेसाठी घडणाऱ्या भाऊबंदकीचे पहिले रूप. यापेक्षा बृहदारण्यकोपनिषदातील माहिती अधिक चांगला प्रकाश टाकते. त्यानुसार देव हे कनियस (कनिष्ठ), अल्पसंख्य, अर्वाचीन (नव्या पक्षाचे) व अध्यात्मावर भर देणारे होते. याउलट असुर ज्यायस (ज्येष्ठ), बहुसंख्य, प्राचीन (जुन्या पक्षाचे) व भौतिक सार्मथ्यावर जोर देणारे आहेत. असुरांची प्रतिमा डागाळण्याचा सतत प्रयत्न झाला तरी त्यांना कुठेही असंस्कृत (ह्वठ्ठष्द्ब१द्बद्यद्ब५द्गस्त्र) व नास्तिक म्हटलेले नाही. त्यांची देवांशी सोयरिक होते. शिवाय वैदिक ऋषी दोहोंचे गुरू असतात.

या संदर्भात ऋग्वेदातील दाशराज्ञ सूक्त लक्षात घेण्यासारखे आहे. ऐतिहासिक घटनेचा आधार असलेले ते एकच सूक्त होय. पुरु, अनु, दुह्यू, तुर्वास व यदू या सप्तसिंधूमध्ये आलेल्या आर्यांच्या पहिल्या टोळ्या. त्यांना पंचजना: म्हटले आहे. नंतर सुदासाच्या नेतृत्वाखाली भरत टोळीचे लोक मोठ्या संख्येने आले. त्यांचा पुरोहित विश्वामित्र होता. पण पंचजनांशी भरतांचे युद्ध जुंपले तेव्हा विश्वामित्राच्या जागी वसिष्ठाची नेमणूक झाली. म्हणून चिडलेल्या विश्वामित्राने भरतांच्या विरुद्ध दहा राजांचा संघ उभारला. तरी भरताचा विजय झाला. म्हणून या उपखंडाला भारतवर्ष हे नाव मिळाले. म्हणजे संघर्ष बहुसंख्य प्राचीन व अल्पसंख्य अर्वाचीन यातला आहे. दोन्ही आर्यच. पुढे पर्यावरण बदलले, सरस्वती नदी आटली, अवर्षणे सुरू झाली तेव्हा ऋषींच्या अन्नासाठी आपसातही मारामाऱ्या होत. आता पूवेर्कडे स्थलांतर करणे भाग पडले.

शेतीची सुरुवात झाल्यानंतर मैदानी प्रदेशातील लोकांना शांतताप्रिय विष्णू अधिक भावला. पहाडी भागात अवैदिक शिवाला महत्त्व होते. त्यामुळे भटक्या लोकांचा आडदांड इंद कालबाह्य झाला. आता भारतवर्ष एका छत्राखाली आणणे आवश्यक होते. रामायणात रामप्रधान वैष्णवांनी उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत व महाभारतात कृष्णप्रधान वैष्णवांनी पश्चिमेकडून पूवेर्पर्यंत भारतखंड एकछत्री करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना अनेक तडजोडी कराव्या लागल्या. जसे शिवाला महादेव म्हणून मान्यता देणे वगैरे. इहलोकातील राजकारणाचे परलोकात पडलेले हे प्रतिबिंब. देव-दानव संघर्षाला त्यातून आणखी एक परिमाण प्राप्त होते. धर्मप्रसार जगात सर्वत्र राजाश्रयांच्या आधारे बळाचा वापर करून झालेला आहे. भारतातील हा प्रयोग तडजोडीच्या राजकारणाचा असल्यामुळे वेगळ्या चिवट पण कमकुवत जातकुळीचा आहे.

मग देव म्हणजे कोण? देव म्हणजे प्रस्थापित, सत्ताधारी, अल्पसंख्य वर्ग, ज्यांची नीती (१ड्डद्यह्वद्ग ह्य४ह्यह्लद्गद्व) इतरांवर लादली जाते. अर्थात स्त्रश्ाद्वद्बठ्ठद्गठ्ठह्ल द्वद्बठ्ठश्ाह्मद्बह्ल४. देवांशी जो जमवून घेऊ शकत नाही तो दैत्य. जगभरच्या कहाण्यांमध्ये देवासुर संग्राम हा करुणरम्य विषय असून नॉर्स मिथ्यकथांमध्ये तो विशेष रंगविलेला आहे, असे दुर्गाबाई भागवत सांगतात. माणसाच्या चांगल्या-वाईट गुणांमुळे संघर्ष निर्माण होतो व त्याचा अंत कुणीतरी चांगला म्हणून विजयी प्रस्थापित होण्यात किंवा प्रस्थापित झाल्यामुळे चांगला ठरण्यात होतो, हेच सूत्र त्यामागे कार्य करताना दिसते.

जगभरच्या कहाण्यांमध्ये देवासुर संग्राम येतो. दुर्गाबाई भागवत काही उदाहरणे देतात परंतु त्यांनी त्याचा अर्थ फोड करून सांगितलेला नाही. आयर्लंड, स्कॉटलँड येथील कहाण्यांमध्ये ओडिन देवांचा राजा व यमर दैत्य आहे. देव यमरला ठार करतात. कहाण्यांमध्ये सुद्धा ओडिन देवांचा राजा व त्याचा धाकटा भाऊ दुष्ट असतो. देवांपुढे हिमदैत्याचा धोका उभा राहतो तेव्हा देव प्रथम त्या दैत्याचा चलाखीने वापर करतात आणि नंतर घनघोर युद्ध होते, हिम दैत्य मारला जातो व सर्व दैत्य नरकात जातात. वर्चस्व गाजवण्याच्या मानवी प्रवृत्तींमुळे हा संघर्ष निर्माण होतो व त्यात जो विजयी होतो तो देव सुष्ट ठरतो, हाच त्याचा अर्थ लागतो. म्हणून विषय वैश्विक आहे.

डॉ. यशवंत रायकर , सौजन्य – मटा

खलिल जिब्रान ( Khalil Gibran १८८३-१९३१) हा अलौकिक प्रतिभावंत, बंडखोर तत्त्वज्ञ साहित्यिक चित्रकार व जीवनाचा भाष्यकार. त्याचे पूर्वज फ्रान्सचे. पण फ्रेंच राज्यक्रांतीनंतर फ्रान्समधून हाकलून लावलेल्या कॅथॉलिक मॅरोनाइट पंथियांनी लेबनॉनच्या डोंगराळ भागात आश्रय घेतला. त्यात जिब्रानचे आई-बाप होते. पण सुवेझ कालवा सुरू झाल्यावर उंटावरून होणारा व्यापार बंद पडला.

पारंपरिक धंदे बुडाले. बहुसंख्य लोकांना उपजीविकेचे साधन राहिले नाही. शिवाय तुर्की अधिकारी छळ करीत, म्हणून अनेकांनी देशत्याग केला. त्यातच खलिल, आई व भावंडांबरोबर अमेरिकेला गेला. तरी तो एकटा परत आला. त्याचा बाप लेबनॉनमध्येच होता. बैरुत येथे ग्रॅज्युएट झाला. अनेक विषय त्याने आत्मसात केले. भ्रमणही खूप केले. पॅरीसला चित्रकलेचे शिक्षण घेतले. १९११ पासून तो न्यूयॉर्कला स्थायिक झाला. जिब्रानचे कुटुंब सावत्र आई-बाप, भावंडांचे होते. पण मनाचे पुरोगामी औदार्य हा त्यांचा सामायिक गुण. एकमेकांना त्यांनी नेहमीच साथ दिली. जिब्रानने आपले चिंतन प्रेषितांच्या तोंडून मोजक्या शब्दात काव्यमय शैलीत मांडले ते त्याच्या वयाच्या पंधराव्या वर्षी. त्याने ते आईला दाखविले. त्या असामान्य स्त्रीने त्याला उत्तेजन देऊन प्रसिद्ध करण्याची घाई करू नये असा सुज्ञ सल्ला दिला. नंतर अनेक वेळा सुधारणा करून त्याने २५ वर्षे धीर धरला. ‘प्रॉफेट’ हे पुस्तक १९२३ साली प्रथम इंग्रजीत व नंतर अरबी भाषेत प्रसिद्ध झाले. आपल्या अध्यात्मिक विकासाचे चित्रण त्याने ‘गार्डन ऑफ दि प्रॉफेट’मध्ये केले. ते त्याच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले. यांत्रिक जीवनशैलीला उबगलेल्या अमेरिकनांना या दोन पुस्तकांनी वेड लावले. गद्यकाव्ये, रूपककथा असे लिखाणही त्याने विपुल केले. जीवनातील विसंगतींवर तो खेळकर टीका करतो तर स्त्रीवरील अन्यायाचे हृदयदावक चित्रणही करतो. पॅरीस येथे त्याने ‘बंडखोर आत्मे’ हा छोटासा कथासंग्रह लिहिला. त्यातून तुर्की राज्यकर्ते व पादी यांनी लेबनॉनच्या जनतेचे चालविले शोषण जगापुढे मांडले. त्यामुळे तरुणांची मने पेटली पण पाद्यांनी पुस्तकाची जाहीर होळी केली. त्याला धर्मबाह्य ठरविले. तुर्कांनी त्याला हद्दपार केले पण अमेरिकेत तो सुखरूप होता. मानवाचा पुत्र येशू. हेसुद्धा कल्पनाशक्तीचा अजब आविष्कार आहे.

जिब्रान अत्यंत धार्मिक आहे. तो देव मानतो मात्र माणसाला पापी ठरवून त्याचे नियंत्रण व शोषण करणारी चर्चची सत्ता त्याला मान्य नाही. ख्रिश्चन असून तो पुनर्जन्म मानतो. जे बुद्धीला व भावनेला पटले ते व्यक्त करताना त्याला कुणाचे भय नसते. परिणामांची पर्वा नसते. धर्मश्रद्धा व देशप्रेम यात संकुचितपणाचा लवलेश नाही. त्याच्यात अनेक विसंगती आहेत पण कोणतीही गोष्ट तो सोयिस्करपणे स्वीकारत नाही. तो महामानव असला तरी एक साधासुधा माणूसही आहे. सततच्या आत्मपरीक्षणामुळे स्वत:ला तो पूर्णपणे ओळखतो. मागे वळून पाहिल्यावर त्याला स्वत:चा क्षुदपणा, रुक्षपणा व बडबड्या स्वभाव यांची लाज वाटते. मन भूतकाळात रमत नाही. त्याला गावाची तीव्र ओढ आहे, आई व बहिणीवर त्याचे नितांत प्रेम आहे. पण मन रोमँटिक परंपरेतले नाही. जिब्रानने लग्न केले नाही. कोणत्याही प्रेमळ स्त्रीची अपेक्षा आपण पुरी करू शकणार नाही हे तो ओळखून होता. तरी तो प्रेमी होता. पण त्याचे प्रेम वैषयिक नव्हते. त्याच्या जीवनात अनेक स्त्रिया येऊन गेल्या. बारबारा यंग ही त्याची शिष्या मृत्यूसमयी त्याच्या जवळ होती. तिनेच त्याचे चरित्र लिहिले. पण दोघे एका खोलीत कधी राहिले नाहीत. ‘मी जियादा’ ( May Ziadeh ) ही त्याची खास प्रेयसी. इजिप्तला स्थायिक झालेली. १९ वर्षे दोघांचे प्रेम व पत्रव्यवहार टिकून होते. जिब्रानच्या मृत्यूनंतर तो प्रसिद्ध झाला, तेव्हा जगाला या स्त्रीबद्दल कळले. दोघे एकमेकांना कधी भेटले नाहीत. त्याने तिचा फोटोसुद्धा कधी मागविला नाही. विरहोपि संगम: खलु परस्परसंगतं मनो येषाम्।

त्याला मृत्यूचे भय नव्हते तरी मरायची इच्छा नव्हती, कारण आणखी काही काम बाकी होते. तो स्वत:च्या प्रकृतीची काळजी घेत नसे. डॉक्टर मंडळी त्याला वाचविण्याची शिकस्त करीत होती. पण त्यांच्या प्रयत्नांवर जिब्रानचा विश्वास नव्हता. विश्रांती त्याला शिक्षा वाटे. ती भोगायला तो तयार नव्हता. त्याला शांत एकांताची ओढ होती. तरी न्यूयॉर्कच्या कोलाहलातच त्याच्या प्रतिमेला धार येई. सत्याला अखंड ओळखा पण शब्दबद्ध क्वचितच करा, असे तो म्हणतो पण सत्य सांगतच राहतो. तो स्वत:ला एक ढग मानतो, वस्तूंशी मिसळणारा पण एकरूप न होणारा. तरी कुणाकडून तरी ‘तू एकटा नाहीस’ हे ऐकू इच्छितो. त्याचे मन मोठे, करुणा विशाल म्हणून दु:खही मोठे. त्यापासून त्याला पलायन नकोय. साऱ्या जगाचे सुख मिळत असेल तरी त्या बदल्यात तो आपले दु:ख द्यायला तयार नव्हता. ‘दु:ख माझे माझियापाशी असू दे, ते बिचारे जाईल कुठे? मी असोनी का अनायासारिके त्याने फिरावे?’ अशीच वृत्ती. आपली सारी धडपड व्यर्थ जाणार की काय, या विचाराने त्याचे मन विषण्ण होई. काही सांगायचे होते ते सर्जनशील शब्दात सांगता येत नव्हते याचे त्याला दु:ख होते. ते दु:ख बरोबर घेऊनच त्याने इहलोक सोडला. त्याचे हे दु:ख म्हणजे मानवजातीबद्दल वाटणारे स्थायी दु:ख, गमे-जीवादा होते. एक शायर म्हणतो, ‘खुदा की देन है जिसको नसीब हो जाए। हर एक दिल को गमे-जावीदा नही मिलता.’

जिब्रान, टागोर व इक्बाल हे तीन महाकवी समकालीन. अनेकांच्या मते जिब्रान त्यात सर्वश्रेष्ठ. टागोरांना ‘नोबेल’ मिळाले, इक्बालला वगळले गेले म्हणून दोघांमध्ये तेढ निर्माण झाली. या सन्मानासाठी जिब्रानचा विचार कधी झालाच नाही, पण याचा विचार जिब्रानला कधी शिवलाच नाही. खरोखरीच ग्रेट!

डॉ.  यशवंत रायकर, सौजन्य – लोकसत्ता

देव म्हणजे प्रस्थापित, सत्ताधारी अल्पसंख्य ज्यांची नीती (Value system) इतरांना प्रमाण मानणे भाग पडते. अर्थात dominant minority. आपला व परका असा भेद करून लोकांकडे पाहणे, हितसंबंध लक्षात घेऊन ‘आपल्या’ला पाठीशी घालणे व ‘परक्या’मागे हात धुवून लागणे, पण गरज पडल्यास त्याच्याशी जमवून घेणे ही वृत्ती त्यामागे आहे. राजकारण व समाजकारण यात त्याचेच चित्र उमटलेले असते. जगभरच्या कहाण्यांमध्ये हा सुरासुर संघर्ष आढळतो.

—————————————————————

देव विरुद्ध दैत्य संघर्ष भारतीय परंपरेतील मध्यवर्ती पौराणिक विषय आहे. तसा तो केवळ हिंदू धर्मशास्त्राचा भाग नसून जगात अन्य समाजातही वेगवेगळ्या रूपात आढळून येतो, पण भारतात त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या संघर्षांतील एक अद्भुत घटना म्हणजे समुद्रमंथन. दोन कट्टर शत्रूंच्या सहकार्याचा तो प्रसंग असल्यामुळे नवलाईचा होय. लोकमानसावर आजही असलेला त्याचा प्रभाव पाहता त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. हा myth व legend यांचा अभ्यास आहे. ती ऐतिहासिक सत्ये नव्हेत, पण वास्तवाच्या कणाभोवती जमा झालेल्या कल्पिताच्या जलबिंदूसारखे त्यांचे स्वरूप असते. विशिष्ट समाजाची ती सामुदायिक स्वप्ने असतात. मिथ ही देवादिकांबद्दलची पवित्र प्राचीन कथा तर लीजण्ड म्हणजे दंतकथा प्रामुख्याने माणसासंबंधी असते असे धरून चालू. एरवी हे शब्द विविध अर्थाने येतात त्यांचा विचार येथे नको. हा अभ्यास म्हणजे कल्पितातून वास्तव वेगळे करण्याचा प्रयास होय. यामुळे मिथकांचे विलयन होते व श्रद्धेच्या नैतिक अधिष्ठानाला धक्का पोहोचतो. म्हणून धार्मिकांना ते कधीच रुचत नाही.

येथे भारतीय परंपरेतील देव आणि दैत्य यांचे बदलत गेलेले अर्थ प्रथम समजून घेतले पाहिजेत. पशुपालन अवस्थेतील आर्याना अग्नी प्रज्वलित ठेवणे अगत्याचे होते. त्यासाठी यज्ञसंस्था आली. दृश्य-अदृश्य तत्त्वांना देवता मानून त्यांची आराधना केली जाई. देवांचा राजा इंद्र. त्याला वश करून घेण्यासाठी यज्ञ होत असत. यज्ञसंस्थेला अफाट महत्त्व असलेल्या काळात सुरासुर संग्रामाची कल्पना जन्मास आली. इंद्र व त्याला पुरून उरणारा वृत्र यांच्यातील युद्धाच्या काव्यमय वर्णनातून कथेची सुरुवात होते, पण हा वृत्र कोण? एक अर्थ असा की, वृत्रामुळे पृथ्वीवर प्रकाश पोहोचत नव्हता, पाऊस पडत नव्हता, नद्या वाहत नव्हत्या. वृत्राला ठार करून इंद्राने त्या वाटा मोकळ्या करून दिल्या. म्हणजे ही सृष्टीच्या आरंभाची दिव्यकथा होय, असे लोकमान्य टिळक म्हणतात. पण असुरांच्या पराभवासाठी यज्ञ केले जातात तेव्हा कथेला वेगळा अर्थ प्राप्त होतो. वैदिक देवतांना मानणारे ते देव व न मानणारे ते असुर यातील तो संघर्ष बनतो. वृत्राची वंशावळ मोठी मनोरंजक आहे. दक्ष प्रजापतीच्या तेरा कन्यांचा विवाह कश्यपशी झाला. या तेरापैकी अदितीचे पुत्र दैत्य, दनूचे दानव व अनायूचे असुर, असेही म्हटलेले आहे. याचा अर्थ सुरासुर संघर्ष सावत्र भावांमधील वैर ठरतो. सत्तेसाठी घडणाऱ्या भाऊबंदकीचे पहिले रूप, पण वैदिक देवतांना मानणारे देव हे सुजन व न मानणारे दैत्य हे दुर्जन असा अर्थ रूढ केला गेला व तोच लोकमानसात घट्ट रुजला. इराणी आर्यसुद्धा अग्निपूजक होते, पण ते वैदिक देवतांना मानीत नव्हते. त्यांच्यात अहुर (असुर) हे चांगले व देव वाईट आहेत. अहुरमज्दा अहुरांचा त्राता व देवांचा काळ. म्हणून वैदिक संस्कृतीत हे शब्द उलटय़ा अर्थाने रूढ झाले. यात आणखी एक गुंतागुंत आहे. अदितीचे पुत्र जे आदित्य त्यापैकी एक त्वष्टा म्हणजे विश्वकर्मा. त्याचा पुत्र वृत्र. अर्थात तो ब्राह्मण. वृत्राचा वध केल्यामुळे इंद्राला ब्रह्महत्येचे पातक लागते. म्हणून त्याला यज्ञ करावे लागतात.

या प्रश्नावर बृहदारण्यकोपनिषदातील माहिती अधिक चांगला प्रकाश टाकते. त्यानुसार देव हे कनिटास (कनिष्ठ), अल्पसंख्य, अर्वाचीन (नव्या पक्षाचे) व अध्यात्मावर भर देणारे होते. याउलट असुर ज्यायस (ज्येष्ठ), बहुसंख्य, प्राचीन (जुन्या पक्षाचे) व भौतिक सामर्थ्यांवर जोर देणारे आहेत. असुरांची प्रतिमा दानव, राक्षस शब्दांनी सतत डागाळण्याचा प्रयत्न झाला तरी त्यांना कुठेही असंस्कृत (uncivilized) व नास्तिक म्हटलेले नाही. त्यांची देवांशी सोयरिक होते. शिवाय वैदिक ऋषी दोहोंचे गुरू असतात.

या संदर्भात ऋग्वेदातील दाशरज्ञ सुक्त उल्लेखनीय आहे. ऐतिहासिक घटनेचा आधार असलेले ते एकमेव सुक्त होय. पुरु, अनु, द्रुह्य़ू, तुर्वास व यदू या सप्तसिंधूमध्ये आलेल्या आर्याच्या पहिल्या टोळ्या. त्यांना पंचजना: म्हटले आहे. नंतर सुदास याच्या नेतृत्वाखाली भरत टोळीचे लोक मोठय़ा संख्येने आले. त्यांचा पुरोहित विश्वामित्र होता, पण पंचजनांशी भरताचे युद्ध जुंपले तेव्हा भरतांनी विश्वामित्राला काढून त्याच्या जागी वसिष्ठाची नेमणूक केली. त्यामुळे खवळलेल्या विश्वामित्राने भरतांविरुद्ध १० राजांचा संघ उभारला. तरी युद्धात भरतांचा विजय झाला. म्हणून या उपखंडाला भारतवर्ष हे नाव मिळाले. पुढे शेतीची सुरुवात झाल्यावर भटक्या लोकांचा आडदांड इंद्र कालबाह्य़ झाला. अशा काळात मैदानी प्रदेशातील लोकांना शांतताप्रिय विष्णू भावला. पहाडी भागांत अवैदिक शिवाला महत्त्व आले. भारतवर्ष एका छत्राखाली आणणे गरजेचे होते. त्यासाठी वैष्णवांनी पुढाकार घेतला. रामायणात रामप्रधान वैष्णवांनी उत्तरेकडून दक्षिणेकडे व महाभारतात कृष्णप्रधानांनी पश्चिमेकडून पूर्वेकडे. त्यामुळे देव-दैत्य संघर्षांला वैष्णव-शैव असे नवे परिमाण प्राप्त झाले. दोहोंमध्ये एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या पौराणिक कथा निर्माण होऊ लागल्या.

मग देव आणि दैत्य म्हणजे कोण? देव म्हणजे प्रस्थापित, सत्ताधारी अल्पसंख्य ज्यांची नीती (Value system) इतरांना प्रमाण मानणे भाग पडते. अर्थात dominant minority. आपला व परका असा भेद करून लोकांकडे पाहणे, हितसंबंध लक्षात घेऊन ‘आपल्या’ला पाठीशी घालणे व ‘परक्या’मागे हात धुवून लागणे, पण गरज पडल्यास त्याच्याशी जमवून घेणे ही वृत्ती त्यामागे आहे. राजकारण व समाजकारण यात त्याचेच चित्र उमटलेले असते. जगभरच्या कहाण्यांमध्ये हा सुरासुर संघर्ष आढळतो. दुर्गाबाई भागवतांनी काही उदाहरणे दिली आहेत. आर्यलड, स्कॉटलंड येथील मिथ्यकथांत ओडिन हा देवांचा राजा व यमर दैत्य आहे. देव यमरला ठार मारतात. नॉर्वे येथील कहाण्यांत ओडिन देवांचा राजा व लोक हा त्याचा धाकटा भाऊ दुष्ट आहे. तो शत्रूला मिळतो. देवांपुढे हिमदैत्याचा धोका उभा राहतो तेव्हा ते चलाखीने हिमदैत्याचा वापर करून नंतर झालेल्या युद्धात त्याला मारतात. सर्व दैत्य नरकात जातात, लोकांना नियंत्रित करण्यासाठी त्यांच्या मनात नरकाची भीती घालायची व मग त्यातून वाचण्याचे मार्ग सांगायचे ही सर्वच धर्माची रणनीती असते.

या पाश्र्वपटलावर समुद्रमंथन पाहू. ही कथा अतिप्राचीन वाटली तरी ती स्मृतिपुराणांच्या काळातली निर्मिती आहे. रामायण, महाभारत, भागवत वगैरेत त्याचे उल्लेख असले तरी विष्णुपुराण हा त्यांचा प्रमुख आधार होय. ते इसवी सनाच्या ३, ४ शतकापूर्वीचे नाही. त्यात मेरु पर्वत, दशावतार यांची माहिती असून गुप्त साम्राज्याचाही उल्लेख येतो. महाभारतात इ. स. ४०० पर्यंत ४ शतकात जी भर पडली त्यातच समुद्रमंथन येऊ शकते. भागवत ६ व्या शतकापूर्वीचे नाही. श्रीकृष्णचरित्राचा तो मुख्य आधार. माणसाला वैराग्य कठीण असल्यामुळे पुराणे भक्तिमार्ग आवर्जून शिकवितात. मत्स्य, कूर्म, वराह, वामन ही उत्तरकालीन पुराणे एकेका अवतारांची महती सांगतात. त्यात अतिशयोक्तीचा अतिरेक असतो, पण तो केवळ पुराणाकडूनच होतो असे नाही. तत्कालीन धर्मपंथांची आपसात चाललेली चढाओढ लक्षात घेतली तर सर्व धर्म त्या बाबतीत एकाच माळेचे मणी असतात हे कळून येते. काही उदाहरणे पाहा. भरताच्या नाटय़शास्त्रात कलांची संख्या ६४, जैन वाङ्मयात ७२ तर बौद्धांच्या ललित विस्तारात ९६. जैनांचे र्तीथकर २४, महायानांचे बुद्ध २४ तर भागवतात विष्णूचे अवतार १० वरून २४ वर येतात. लिंगपुराण शंकराचे २८ अवतार सांगून त्यावर कडी करते. आता बौद्ध त्यापुढचे पाऊल टाकतात. लंकावतार सूत्रात बुद्ध ३६, ललित विस्तारात ५४ तर महावस्तूमध्ये १०० च्या वर बुद्ध आहेत. आपल्या हीरोंना तोंडे किती किती असावीत यातही दुसऱ्याला मागे टाकण्याची धडपड दिसते. रावण दशानन तर बौद्धांचा अवलोकितेश्वर ११ तोंडांचा (कन्हेरी येथील शिल्प पाहा.) आणि शाक्तांची सीता कालीचे रूप धारण करून ज्या रावणाचा वध करते तो रावण सहस्रमुखी असतो. तसेच जैन पुराणांनुसार महावीर १२ फूट उंच, पाश्र्वनाथ १६ फूट, तर वृषभनाथ ३००० फूट उंच होते. आपला भूतकाळ जास्तीत जास्त प्राचीन करण्याचीही वृत्ती असते. पहिला मत्स्यावतार कृतयुगाच्या सुरुवातीस झाला. म्हणजे ४३ लक्ष २० हजार वर्षांपूर्वी, तर वृषभनाथाचे वय पृथ्वीच्या वयापेक्षाही अधिक आहे. असे होण्याचे कारण मानवी मनाला गूढ, अलौकिक, अघटित, असंभवनीय अशा गोष्टींचे आकर्षण असते. लोकांचा चमत्कारावर विश्वास असतो व तो आजही आहे. समुद्रमंथन ही घटना त्याचाच परिपाक होय. ती एक Monumental Fantasy आहे.

देव आणि दैत्य यांची पहिल्यापासून एकच महत्त्वाकांक्षा असते, ती म्हणजे तीनही लोकांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करणे. यामुळे सुरासुर संग्राम चालू राहतो. पण त्यात दोन्ही पक्षांपुढे एक अघटित समस्या उभी राहते, जी समुद्रमंथन केल्याशिवाय सुटणारी नसते. हे मंथन दोहोंनी परस्परसहकार्य केल्याशिवाय शक्य नसते. या महानाटय़ात तिसरा एक घटक असतो तो तपस्वी ऋषींचा. या ऋषींचे स्थान इंद्र, विष्णू व शिव यांच्या खालचे असले तरी त्यांच्या तपसामर्थ्यांला व शापाला देवसुद्धा भिऊन असतात. हे तपस्वी अत्यंत तापट, महत्त्वाकांक्षी व सूडबुद्धीचे असतात. एका पक्षात आपल्याला सर्वोच्च स्थान लाभले नाही तर विरोधी पक्षात जाऊन ते मिळवितात. विश्वामित्राचे उदाहरण मागे येऊन गेलेले आहे. समुद्रमंथनाच्या महानाटय़ात शुक्राचार्य व दुर्वास महत्त्वाच्या भूमिका बजावतात. पौराणिक कथांच्या तपशिलात न शिरता आपण समुद्रमंथनाचा घटनाक्रम पाहू. या कथा परस्परविरोधी व विसंगत असतात. येथे मेळ न घालता फक्त मर्म शोधणे आहे.

शुक्राचार्याला देवांचा गुरू व्हायचे असते, पण ती संधी हुकल्यामुळे तो दैत्यांचा गुरू बनतो. दैत्यांचा पराभव होऊ नये म्हणून मृतांना जिवंत करणारा संजीवनी मंत्र प्राप्त करून घेण्यासाठी शिवाची कठोर तपस्या करतो. त्याचा तपस्याभंग करण्यासाठी इंद्र कपट रचतो, पण शंकराच्या ते लक्षात येताच स्वत: प्रकट होऊन तो शुक्राचार्याला संजीवनी मंत्र देऊ करतो. त्यामुळे युद्धात मेलेले दैत्य जिवंत होतात. देवांचा पराभव होत राहतो. दुसऱ्या एका कथेनुसार इंद्राच्या हातून दुर्वास ऋषींचा अपमान होतो. त्यामुळे संतापलेला मुनीवर इंद्राचे सर्व सामथ्र्य व वैभव नष्ट होईल असा शाप देतो. यामुळे लज्जित व हताश झालेला इंद्र सर्व देवांना घेऊन विष्णूला शरण जातो.

शांत चित्ताचा प्रॅग्मॅटिक विष्णू देवांच्या कूटनीतीचा मास्टरमाइंड आहे. प्रत्येक संकटावर मात करण्याची योजना त्याच्याकडे तयार असते. तो युक्ती सुचवितो. त्यानुसार देव शुक्राचार्याला विश्वासात घेऊन म्हणतात, ‘‘तुझ्याकडे संजीवनी मंत्र आहे म्हणून तू दैत्यांना जिवंत करतोस. पण उद्या तूच नसलास तर कोण कुणाला जिवंत करील?’’ शुक्राचार्य बुचकळ्यात पडतो. मग त्यावरचा उपाय सांगतात. अमरत्व देणारे अमृत मिळविणे. पण ते समुद्राच्या पोटात असते. त्यासाठी समुद्रमंथन करायला हवे. जे देव व दैत्य यांनी परस्परसहकार्य केल्याशिवाय शक्य नसते. शुक्राचार्याला पटते. मग मंदार पर्वताची रवी, वासुकी नागाची दोरी करून देव व दैत्य समुद्र घुसळायला निघतात. पण मंदार पर्वत समुद्रात बुडू लागतो. तेव्हा विष्णू कूर्मावतार धारण करून पर्वताला पाठीवर उचलतो. मंथन यशस्वी होते. त्यातून १४ रत्ने बाहेर येतात. या रत्नांची यादी व संख्या वेगवेगळी असली तरी आपल्याकडे लग्नाच्या वेळी मंगलाष्टकांत म्हटले जाणारे कडवे प्रमाण मानू. (चौकट पाहा) या रत्नांमधील हलाहल गंभीर समस्या उभी करते. तेव्हा शिव जगाच्या कल्याणासाठी ते आपणहून प्राशन करतो. पण अंगात भिनू देत नाही. यात पार्वती विधायक भूमिका बजावते. त्यामुळे शिव नीलकण्ठ बनतो. हे मिथक अत्यंत उद्बोधक आहे. प्रत्येकाला जीवनातील कटू अनुभवांचे विष प्यावेच लागते. (जीवन ही अमर जहर है तो पीना ही पडेगा।) त्यामुळे मनात त्रासिक कडवटपणा भरतो, जो स्वत:ला व इतरांनासुद्धा सुख लागू देत नाही. पण मोठय़ा मनाची माणसे नीलकण्ठ बनतात.

मंथनातून अखेर देवांचा डॉक्टर धन्वंतरी अमृतकलश घेऊन बाहेर येतो तेव्हा तो पळविण्यासाठी देव व दैत्य यांच्यात युद्ध जुंपते. पण विष्णूचा गरुड कलश घेऊन वरच्या वर उडतो. त्यातले चार थेंब प्रयाग, हरिद्वार, उज्जयिनी व नाशिक येथे पडतात. म्हणून ती पवित्र तीर्थक्षेत्रे बनून दर बारा वर्षांनी तेथे कुंभमेळा भरतो. ही प्रथा आजही चालू आहे. पण दैत्य पुन्हा कुंभावर झडप घालतात. तेव्हा त्यांचे मन विचलित करण्यासाठी विष्णू मोहिनीचे रूप धारण करतो. त्यामुळे कलश देवांना प्राप्त होतो. अमृत पिऊन देव अमर बनतात. त्यातही गुंतागुंत आहे. एक दैत्य राहूचे रूप धारण करून देवांच्यात घुसतो व अमृत पिऊ लागतो. सूर्य व चंद्र यांच्या ते लक्षात येते. ते मोहिनीला सावध करतात. लगेच सुदर्शन चक्र त्या दैत्याचा शिरच्छेद करते. पण थोडे अमृत घशापर्यंत गेल्यामुळे मुंडके (म्हणजे राहू) अमर बनते व धड (म्हणजे केतू) वेगळे पडते. चंद्र सूर्यानी चुगली केल्यामुळे राहू व केतू त्यांना आळीपाळीने ग्रहण लावून कायमचा बदला घेत राहतात.

समुद्रमंथनाच्या कथेत विष्णूचा महिमा, त्याच्या अवतारांचे माहात्म्य, शिवाचा परोपकारी, सरळसोट, निष्कपट स्वभाव, त्याला लाभलेली पत्नीची साथ, तीर्थक्षेत्रे व तीर्थयात्रांचे पावित्र्य, ग्रहणासारख्या खगोलशास्त्रीय घटना या सर्वाचे मिश्रण करून, मानवी मनावर राज्य करणारी मॉन्युमेंटल फॅन्टसी उभी करण्यात आली. थायलँड, कंबोडिया, इंडोनेशिया, मलायसिया येथील लोकांचे पूर्वज भारतातून आलेले असल्यामुळे या फॅन्टसीच्या माध्यमातून ते त्यांची आठवण जपतात. बँकॉक (थायलँड) येथील सुवर्णभूमी विमानतळावर समुद्रमंथनाचे भव्यदिव्य शिल्प पाहून प्रवाशांची मने थक्क होतात.

डॉ. यशवंत रायकर, सौजन्य – मटा

देव विरुद्ध दैत्य संघर्ष भारतीय परंपरेतील एक मध्यवतीर् विषय आहे. पण तो केवळ हिंदू धर्मशास्त्राचा भाग नसून मिथकाच्या भाषेत व्यक्त झालेला, मानवी इतिहासातील सत्तासंघर्षाचा मूलभूत प्रश्न आहे. पशूपालन अवस्थेतील आर्यांना अग्नी प्रज्वलित ठेवणे अगत्याचे होते. त्यासाठी यज्ञसंस्था आली. पृथ्वी, आकाश व अंतरिक्ष येथील दृश्य व अदृश्य तत्त्वांना देवता मानून त्यांची आराधना केली जाई. स्त्री, संतती, गोधन, दीर्घायुष्य लाभावे, शत्रूचा नाश व्हावा यासाठी यज्ञ होत. देवांचा राजा इंद. त्याला वश करून घेणे हा हेतू. यज्ञ संस्थेला अफाट महत्त्व असलेल्या अशा काळात सुरासुर संग्रामाची कथा जन्मास आली. इंद व त्याला भारी पडणारा त्याचा शत्रू वृत्र यांच्यातील युद्धाच्या काव्यमय वर्णनातून या कथेची सुरुवात होते. पुढे तिला वेळोवेळी सोयीस्कर वळणे दिली आहेत. असुरांच्या पराभवासाठी यज्ञ केले जात असल्यामुळे कथेला एक वेगळा अर्थ प्राप्त होतो. वैदिक देवतांना मानणारे व न मानणारे यांतील तो संघर्ष बनतो. तत्कालीन इराणी आर्यसुद्धा अग्निपूजक होते पण ते वैदिक देवतांना मानीत नसत. त्यांच्यात अहुर (असुर) हे चांगले व देव वाईट आहेत. अहुरमज्दा अहुरांचा त्राता व देवांचा काळ. म्हणून वैदिक संस्कृतीत हे शब्द उलट्या अर्थाने रुढ झाले. पण हा वृत्र कोण? एक अर्थ असा की, वृत्रामुळे पृथ्वीवर प्रकाश नव्हता, पाऊस पडत नव्हता, नद्या वाहत नव्हत्या. वृत्राला मारून इंदाने त्यांच्या वाटा मोकळ्या करून दिल्या. म्हणजे ही सृष्टीच्या आरंभाची कथा होय. इति- लो. टिळक. डोंगरांना पंख असल्यामुळे ते एका जागेवर राहत नव्हते; इंदाने त्यांचे पंख तोडले या मिथ्यकथेत उपखंड उत्तरेकडे सरकत असल्यामुळे हिमालयाची उंची वाढत होती, या भूवैज्ञानिक तथ्याची पुसट जाण व्यक्त होते.

वृत्राची वंशावळ मोठी मनोरंजक आहे. दक्ष प्रजापतीच्या तेरा कन्यांचा विवाह कश्यपाशी झाला. या तेरापैकी अदितीचे पुत्र ते आदित्य. त्वष्ट्रा (म्हणजे विश्वकर्मा) त्यापैकी एक. त्याचा पुत्र वृत्र. अर्थात तो ब्राह्माण. त्याच्या वधामुळे इंदाला ब्रह्माहत्येचे पाप लागते. पापक्षालनासाठी त्याला यज्ञ करावे लागतात. याखेरीज कश्यपाला दितीपासून झालेले पुत्र दैत्य, दनूपासून झालेले दानव व अनायूपासून झालेले असुर असेही म्हटले आहे. याचा अर्थ सुरासुर संघर्ष सावत्र भावांमधील वैर ठरतो. सत्तेसाठी घडणाऱ्या भाऊबंदकीचे पहिले रूप. यापेक्षा बृहदारण्यकोपनिषदातील माहिती अधिक चांगला प्रकाश टाकते. त्यानुसार देव हे कनियस (कनिष्ठ), अल्पसंख्य, अर्वाचीन (नव्या पक्षाचे) व अध्यात्मावर भर देणारे होते. याउलट असुर ज्यायस (ज्येष्ठ), बहुसंख्य, प्राचीन (जुन्या पक्षाचे) व भौतिक सार्मथ्यावर जोर देणारे आहेत. असुरांची प्रतिमा डागाळण्याचा सतत प्रयत्न झाला तरी त्यांना कुठेही असंस्कृत (ह्वठ्ठष्द्ब१द्बद्यद्ब५द्गस्त्र) व नास्तिक म्हटलेले नाही. त्यांची देवांशी सोयरिक होते. शिवाय वैदिक ऋषी दोहोंचे गुरू असतात.

या संदर्भात ऋग्वेदातील दाशराज्ञ सूक्त लक्षात घेण्यासारखे आहे. ऐतिहासिक घटनेचा आधार असलेले ते एकच सूक्त होय. पुरु, अनु, दुह्यू, तुर्वास व यदू या सप्तसिंधूमध्ये आलेल्या आर्यांच्या पहिल्या टोळ्या. त्यांना पंचजना: म्हटले आहे. नंतर सुदासाच्या नेतृत्वाखाली भरत टोळीचे लोक मोठ्या संख्येने आले. त्यांचा पुरोहित विश्वामित्र होता. पण पंचजनांशी भरतांचे युद्ध जुंपले तेव्हा विश्वामित्राच्या जागी वसिष्ठाची नेमणूक झाली. म्हणून चिडलेल्या विश्वामित्राने भरतांच्या विरुद्ध दहा राजांचा संघ उभारला. तरी भरताचा विजय झाला. म्हणून या उपखंडाला भारतवर्ष हे नाव मिळाले. म्हणजे संघर्ष बहुसंख्य प्राचीन व अल्पसंख्य अर्वाचीन यातला आहे. दोन्ही आर्यच. पुढे पर्यावरण बदलले, सरस्वती नदी आटली, अवर्षणे सुरू झाली तेव्हा ऋषींच्या अन्नासाठी आपसातही मारामाऱ्या होत. आता पूवेर्कडे स्थलांतर करणे भाग पडले.

शेतीची सुरुवात झाल्यानंतर मैदानी प्रदेशातील लोकांना शांतताप्रिय विष्णू अधिक भावला. पहाडी भागात अवैदिक शिवाला महत्त्व होते. त्यामुळे भटक्या लोकांचा आडदांड इंद कालबाह्य झाला. आता भारतवर्ष एका छत्राखाली आणणे आवश्यक होते. रामायणात रामप्रधान वैष्णवांनी उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत व महाभारतात कृष्णप्रधान वैष्णवांनी पश्चिमेकडून पूवेर्पर्यंत भारतखंड एकछत्री करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना अनेक तडजोडी कराव्या लागल्या. जसे शिवाला महादेव म्हणून मान्यता देणे वगैरे. इहलोकातील राजकारणाचे परलोकात पडलेले हे प्रतिबिंब. देव-दानव संघर्षाला त्यातून आणखी एक परिमाण प्राप्त होते. धर्मप्रसार जगात सर्वत्र राजाश्रयांच्या आधारे बळाचा वापर करून झालेला आहे. भारतातील हा प्रयोग तडजोडीच्या राजकारणाचा असल्यामुळे वेगळ्या चिवट पण कमकुवत जातकुळीचा आहे.

मग देव म्हणजे कोण? देव म्हणजे प्रस्थापित, सत्ताधारी, अल्पसंख्य वर्ग, ज्यांची नीती (१ड्डद्यह्वद्ग ह्य४ह्यह्लद्गद्व) इतरांवर लादली जाते. अर्थात स्त्रश्ाद्वद्बठ्ठद्गठ्ठह्ल द्वद्बठ्ठश्ाह्मद्बह्ल४. देवांशी जो जमवून घेऊ शकत नाही तो दैत्य. जगभरच्या कहाण्यांमध्ये देवासुर संग्राम हा करुणरम्य विषय असून नॉर्स मिथ्यकथांमध्ये तो विशेष रंगविलेला आहे, असे दुर्गाबाई भागवत सांगतात. माणसाच्या चांगल्या-वाईट गुणांमुळे संघर्ष निर्माण होतो व त्याचा अंत कुणीतरी चांगला म्हणून विजयी प्रस्थापित होण्यात किंवा प्रस्थापित झाल्यामुळे चांगला ठरण्यात होतो, हेच सूत्र त्यामागे कार्य करताना दिसते.

जगभरच्या कहाण्यांमध्ये देवासुर संग्राम येतो. दुर्गाबाई भागवत काही उदाहरणे देतात परंतु त्यांनी त्याचा अर्थ फोड करून सांगितलेला नाही. आयर्लंड, स्कॉटलँड येथील कहाण्यांमध्ये ओडिन देवांचा राजा व यमर दैत्य आहे. देव यमरला ठार करतात. कहाण्यांमध्ये सुद्धा ओडिन देवांचा राजा व त्याचा धाकटा भाऊ दुष्ट असतो. देवांपुढे हिमदैत्याचा धोका उभा राहतो तेव्हा देव प्रथम त्या दैत्याचा चलाखीने वापर करतात आणि नंतर घनघोर युद्ध होते, हिम दैत्य मारला जातो व सर्व दैत्य नरकात जातात. वर्चस्व गाजवण्याच्या मानवी प्रवृत्तींमुळे हा संघर्ष निर्माण होतो व त्यात जो विजयी होतो तो देव सुष्ट ठरतो, हाच त्याचा अर्थ लागतो. म्हणून विषय वैश्विक आहे.